🕒 1 min read
मुंबई : ओबीसी आरक्षण रद्द झाल्यानंतर राज्यातील पाच जिल्हा परिषदा आणि पंचायत समितीच्या पोटनिवडणुका जाहीर झाल्या आहेत. या निवडणुका जाहीर झाल्यामुळे ओबीसी समाजावर अन्याय झाला असल्याचे मत भाजप नेत्या आमदार पंकजा मुंडे यांनी यांनी व्यक्त केले आहे. या संदर्भात न्यायालयात जाण्याचा इशाराही त्यांनी दिला आहे.
पंकजा मुंडे यांनी राज्य सरकारला देखील या संदर्भात भूमीका घेण्याची मागणी केली आहे. सोशल मीडियाच्या माध्यमातून त्यांनी तशी मागणी केली. त्यांनी लिहिले की, ‘धुळे, नंदुरबार सह राज्यातील पाच जिल्हा परिषदा आणि पंचायत समितीच्या पोटनिवडणुका लागल्याचे समजले. ओबीसींच्या राजकीय आरक्षणाचा विषय अत्यंत संवेदनशील होत असताना या निवडणुका जाहीर होणं हा ओबीसींवर घोर अन्याय आहे.’
धुळे, नंदुरबार सह राज्यातील पाच जिल्हा परिषदा आणि पंचायत समितीच्या पोटनिवडणुका लागल्याचे समजले. ओबीसींच्या राजकीय आरक्षणाचा विषय अत्यंत संवेदनशील होत असताना या निवडणुका जाहीर होणं हा ओबीसींवर घोर अन्याय आहे. #obcreservation pic.twitter.com/E9cVqZZGK7
— Pankaja Gopinath Munde (@Pankajamunde) June 22, 2021
मराठा आरक्षणाबरोबरच स्थानिक स्वराज्य संस्थांमधील ओबीसी आरक्षण आणि पदोन्नतीमधील आरक्षणही रद्द झाले आहे. राज्य सरकारच्या दुर्लक्षामुळेच आरक्षण रद्द झाल्याचा आरोप भाजपच्या वतीने करण्यात येत आहे. राज्य सरकार मधील ओबीसी मंत्री देखील या संदर्भात भूमीका घेण्याची मागणी करत होते. राज्य सरकार ओबीसी समाजावर अन्याय होवू देणार नसल्याचे या मंत्र्यांनी म्हटले होते. मात्र, निवडणुकींची घोषणा झाल्यामुळे आता या मंत्र्यांवर टीका होत आहे.
महत्त्वाच्या बातम्या
- आता राष्ट्रवादी आणि शिवसेना मिळून नगरमध्ये भाजपचा ‘करेक्ट कार्यक्रम’ करणार
- ‘जाणत्यां’ना या वयात हेही चवनप्राश, ‘राष्ट्र मंच’च्या बैठकीवरून भातखळकरांनी उडवली खिल्ली
- ‘सरकारच्या पाठपुराव्या अभावीच ओबीसी आरक्षण रद्द’, खा. भागवत कराड यांचा आरोप
- ‘काही लोक पुनर्विचार याचिकेबाबत ट्विटर वरून माहिती देतायत, हे काय गौडबंगाल ?’
- दिलासादायक : पिंपरी-चिंचवडमध्ये ऍक्टिव्ह कोरोना रुग्णांची संख्या १ हजाराखाली
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
