Share

… म्हणून RSS चा सरकारमध्ये हस्तक्षेप : मोहन भागवत

Published On: 

टीम महाराष्ट्र देशा : राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक मोहन भागवत यांनी मोठ विधान केले आहे. त्यांनी संघ सरकारमध्ये हस्तक्षेप करते परंतु का करते याचेही कारण भागवत यांनी सांगितले आहे. ते नागपूरमधील एका कार्यक्रमात बोलत होते. यावेळी त्यांनी इतरही अनेक मुद्यांवर भाष्य केले.

मोहन भागवत यांनी ‘सत्तेत आपल्या विचाराचे लोक आहेत. पण ते एका तंत्रात आहे. त्यांच्या मनात योग्य विचार असूनंही त्यांनी केलेली सर्व कामं योग्य असतीलच असं नाही. सरकारी धोरणात आम्ही हस्तक्षेप करतो, पण तो हस्तक्षेप समाज हितासाठी आहे. संघाचा प्रभाव दाखवण्यासाठी नाही असं विधान केले.

तसेच पुढे लघु उद्योगांविषयी बोलताना ‘देशातील उद्योगपतींमध्ये देशाची संस्कृती आहे, म्हणून ते दान करतात. संविधानामुळे राजकीय आणि आर्थिक स्वातंत्र्य येईल, असं डॉ. बाबासाहेब आंबेडकर म्हणाले होते. जगातील सर्व संपत्ती काही मोठ्या लोकांकडे आहे. ईस्ट इंडिया कंपनीच्या आधी कंपन्या नव्हत्या, पण उद्योग सुरु होते. आर्थिक स्वातंत्र्य मिळण्यासाठी स्वावलंबनाची गरजेचं आहे असंही विधान केले.

दरम्यान, राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या नियमांविषयी बोलताना ‘संघ हा नियमांनुसार चालतो. इथे शिस्त आहे. मी सरसंघचालक नसणार तेव्हा संघाचा सर्वसामान्य स्वयंसेवक असेल असंही मोहन भागवत यांनी सांगितलं.

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!