Share

बनावट ओळख पत्र बनवून निवडणूक आयोगाची फसवणूक करणारा दहा वर्षांनतर अटकेत

Published On: 

औरंगाबाद : गुन्हे शाखेमार्फत सध्या फरार आरोपींचा शोध घेण्याची मोहीम हाती घेण्यात आली आहे. याच दरम्यान २००९ साली बनावट ओळखपत्र बनवून निवडणूक आयोगाची फसवणूक करून, दहा वर्षापासून फरार असलेल्या आरोपीला अटक करण्यात पोलिसांना यश आलं आहे. राजू सरदार शहा वय ४५, रा. मातोश्री नगर, रांजणगाव असे आरोपीचे नाव आहे.

पोलीसंनी दिलेल्या माहिती नुसार, निवडणूक आयोगाचे ओळख पत्र बनविण्यासाठी, रहिवासी प्रमाणपत्र, शाळा सोडल्याचा दाखला, निवडणूक आयोगाचा फॉर्म क्रमांक सहा अशी सर्व बनावट कागाद पत्र शहा याने निवडणूक आयोगाच्या कार्यालयात २००९ साली जमा केली होती. आयोगाच्या पडताळणीत सर्व कागद बनावट असल्याने तत्कालीन अधिकाऱ्यांनी सिटी चौक पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला होता.

गुन्हे शाखेच्या पथकाला राजू शहा हा रांजणगावात असल्याची माहिती मिळाली. माहितीची खात्री करून सापळा लावण्यात आला. राजू शहा रांजणगावात येताच पथकाने त्याला ताब्यात घेतले. त्यानंतर तपास कामी त्याला सिटी चौक पोलिसांच्या स्वाधीन करण्यात आले. हि कारवाई सहाय्यक फौजदार विठल जवखेडे यांच्या पथकाने केली.

महत्वाच्या बातम्या 

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!