मुंबई : राष्ट्रवादी कॉंग्रेसचा आज २२ वा वर्धापन दिन आहे. काँग्रेसमधून निलंबित करण्यात आल्यानंतर शरद पवारांनी स्वतंत्र मोट बांधत राष्ट्रवादी काँग्रेसची बीजं पेरली. तिच राष्ट्रवादी काँग्रेस आज राज्यातील सत्तेत महत्त्वाच्या भूमिकेत वावरताना दिसत आहे.
वर्धापन दिनाच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी एका वृत्तवाहिनीला मुलाखत दिली आहे, या मुलाखतीत भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांच्या महाविकास आघाडी सरकार पडणार असल्याच्या दाव्यावर भाष्य केले आहे.
चंद्रकात पाटील यांच्याबद्दल आदर आणि आपुलकी आहे. आमच्या कोल्हापूरचे असल्याने जिव्हाळ्याची आपुलकी आहे. आम्हा कोल्हापूर, सांगलीकरांना सोडून ते पुण्याला गेले याचा मनात थोडासा रागही आहे. कोल्हापूरला न थांबता पुण्याला जाणं हे कोल्हापूरकर आणि पुणेकर दोघांनाही आवडलेलं नाही. आमचे वैयक्तिक संबंध चांगले आहेत. पण त्यांनी असं करायला नको होतं,” असा टोला जयंत पाटील यांनी लगावला.
“झोपेतही सरकार बदलले असं ते म्हणाले आहेत. पक्षातील कार्यकर्ते टीकावेत म्हणून ते असं बोलत असतात. मी त्यांना नाही तर परिस्थितीला दोष देतो. राष्ट्रवादी आणि काँग्रेसमधून तिकडे गेलेल्यांना धीर धरावा म्हणून ते १५ दिवसांनी सरकार येणार असं वक्तव्य करत असता. दीड वर्षांपासून ते घोषणा करत असून त्यापेक्षा विरोधी पक्ष म्हणून काम केलं पाहिजे. कुठेच लक्ष दिलं जात नसल्याने सक्षम विरोधी पक्ष म्हणून काम केलं तर सरकारलाही फायदाही होईल आणि त्यांचा नावलौकिकही वाढेल,” असा सल्ला जयंत पाटील यांनी यावेळी दिला.
महत्वाच्या बातम्या
- ‘दादा’गिरी! ट्रोल झाल्यानंतर गांगुलीने पुन्हा पोस्ट केला ‘तो’ फोटो
- दिल्लीतील शेतकरी आंदोलनाला मुख्यमंत्री ममतांचा पाठिंबा
- कृषी कायद्याचा मुद्दा; मोदी सरकार शेतकऱ्यांसोबत चर्चेसाठी तयार
- ‘भररस्त्यातच फ्रान्सच्या अध्यक्षांच्या श्रीमुखात भडकवली, जनतेच्या संयमाचा कडेलोट होऊ देऊ नका’
- एक तास लाखाचा ; पहा भारतीय क्रिकटपटुंची कमाई


