Share

तेलंगणाने दिली शेतकऱ्यांसाठी 24 तास मोफत वीज ; महाराष्ट्रात कधी ?

Published On: 

टीम महाराष्ट्र देशा: आस्मानी संकटातून शेतकरी वाचला तर त्यावर सुलतानी संकट ओढवत विहिरीत पाणी असून विजेअभावी तो पिकाला देऊ शकत नाही. पण शेतीसाठी आता २४ तास मोफत वीज मिळणार आहे. आणि असं करणारं तेलंगणा देशातील पहिल राज्य ठरलं आहे. तेलंगणा राज्यातील 23 लाख शेतकऱ्यांना लाभ मिळणार आहे.

नवीन वर्षाच्या मुहूर्तावर शेतकऱ्यांना मुख्यमंत्री के. चंद्रशेखर राव यांनी ही महत्वाची भेट दिली.
31 डिसेंबरला मध्यरात्री 12 वाजून एक मिनिटांनी कृषी पंपांना/ शेतीला 24 तास अखंड आणि मोफत वीजपुरवठा सुरु झाला. अशाप्रकारे शेतीला वीजपुरवठा करणारं तेलंगणा हे देशातलं पहिलं राज्य असल्याचा दावा के. चंद्रशेखर राव यांनी केला.

या उलट महाराष्ट्रात ‘धरण उशाला अन कोरड घशाला’ अशी परिस्थिती झाली झाली आहे. वरूनराज्याने कृपा केली आणि राज्यात मुबलक पाऊस झाला. पण विजेअभावी शेतीला पाणी देता येत नाही त्यामुळे उभी पिके करपली आहे. दुसरीकडे बोण्डअळीने शेतकऱ्याचे कंबरडे मोडले आहे. अशात तेलंगणा राज्याचा आदर्श घेऊन मुख्यमंत्री आणि सरकार राज्यातील शेतकऱ्यांना मदत करणार का असा प्रश्न राज्यातील शेतकरी विचारात आहेत.

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!