मुंबई – आजपासून शारदीय नवरात्रोत्सवाला सुरुवात होत आहे. आदिशक्तींची पूजा देशभरात या काळात केली जाते. महाराष्ट्रात तुळजापूर, कोल्हापूर, वणी आणि माहूर या साडेतीनशक्तिपीठांमध्ये पारंपरिक पद्धतीने हा नवरात्रोत्सव साजरा केला जातो. या काळात महाराष्ट्रासह कर्नाटक, आंध्रप्रदेश व इतर राज्यातील लाखो भाविक देवीचे मनोभावे दर्शन घेत असतात.
या वर्षी कोरोनाच्या सावटामुळे मंदिरे उघडलेली नाहीत. या उत्सव काळात देवींचे सर्व धार्मिक विधी पार पडणार असल्याचेदेवस्थान समितींमार्फत असून भाविकांना देवींचे दरवर्षीप्रमाणे दर्शन घेता येणार नाही. मंदिर व्यवस्थापनांनी भक्तांसाठी ऑनलाइन दर्शनाची सोय करून दिली आहे.भारतीय संस्कृतीत अनन्यसाधारण महत्व असलेल्या, देवीरुपातील स्त्रीशक्तीचे दररोज पूजन होणाऱ्या शारदीय नवरात्रोत्सवाची उद्यापासून सुरुवात होत असून उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी राज्यातील जनतेला घटस्थापना व नवरात्रोत्सवाच्या शुभेच्छा दिल्या आहेत.
कोरोना संकटाच्या पार्श्वभूमीवर यंदाचा नवरात्रोत्सव साजरा करताना सोशल डिस्टन्सिंग, कोरोनाप्रतिबंधक नियमांचे काटेकोर पालन होईल. यंदाचा नवरात्रोत्सव साधेपणाने व शक्यतो घरीच साजरा होईल, अशी अपेक्षा व्यक्त करीत, नागरिकांनी, देवीभक्तांनी उत्सवकाळात स्वत:ला, कुटुंबाला, समाजाला कोरोनाची लागण होणार नाही याची काळजी घ्यावी असे आवाहनही उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केले आहे.
महाराष्ट्राच्या तमाम जनतेला 'घटस्थापना' आणि 'नवरात्रौत्सवा'च्या हार्दिक शुभेच्छा! कोरोना संकटाच्या पार्श्वभूमीवर यंदाचा सण साधेपणानं व घरीच साजरा होईल, सोशल डिस्टन्सिंग, कोरोनाप्रतिबंधक नियमांचं काटेकोर पालन केलं जाईल, अशी आशा व्यक्त करतो.#Navratri pic.twitter.com/gO2Tlsj0hq
— Ajit Pawar (@AjitPawarSpeaks) October 17, 2020
घटस्थापना व नवरात्रोत्सवाच्या शुभेच्छा देताना उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी नवरात्रोत्सव हा स्त्रीशक्तीचे पूजन करण्याचा उत्सव. नवरात्रोत्सवाच्या निमित्ताने श्रीदुर्गामाता, श्रीअंबामाता, श्रीरेणुकामाता, श्रीलक्ष्मी, श्रीसरस्वती आदी रुपातील स्त्रीशक्तीचे पूजन करताना आपल्या कुटुंबातील, गावातील, शहरातील, समाजातील माता-भगिनींचाही सन्मान वाढवण्याचे काम झाले पाहिजे. माता-भगिनींना त्यांचा हक्क, न्याय, सन्मान मिळेल. त्यांच्यावर अन्याय होणार नाही आणि होऊ देणार नाही असा संकल्प आजच्या घटस्थापनेच्या निमित्ताने करुया असेही शुभेच्छा संदेशात म्हटले आहे.
महत्वाच्या बातम्या-
- राजकीय द्वेष पसरवण्यासाठीच मदरश्यांबाबत ‘ती’ मागणी भाजपने केली – राष्ट्रवादी
- निवडणुकीपूर्वी प्रत्यक्ष बांधावर जाणारे उद्धवजी आता आभासी पद्धतीने बांधावर जात आहेत : मनसे
- ‘लोकांना दिलासा देण्यासाठी मुख्यमंत्र्यांनी अतिवृष्टी झालेल्या भागाचा प्रत्यक्ष दौरा करावा’
- सरकारने अहमदनगर जिल्हात ओला दुष्काळ जाहीर करावा- शिवाजी कर्डिले
- खडसेंच्या राष्ट्रवादी प्रवेशाचा निघाला फुसका बार !
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

