ऑस्ट्रेलिया : ऑस्ट्रेलियातील सिडनी क्रिकेट ग्राऊंडवर ऑस्ट्रेलिया विरुद्ध टीम इंडियात तिसरा कसोटी सामना खेळवण्यात येत आहे. साधारणपणे ऑस्ट्रेलिया विरुद्ध टीम इंडिया यांच्यातील सामन्यात खेळाडू एकमेकांना डिवचतात. यामध्ये काहीवेळा हे खेळाडू शिवीगाळही करतात. मात्र आता क्रिकेट सामना पाहायला आलेल्या चाहत्यांकडून शिवीगाळ तसेच वर्णद्वेषी टीका करण्यात आली आहे. ऑस्ट्रेलियाच्या समर्थकांनी टीम इंडियाचे गोलंदाज मोहम्मद सिराज आणि जसप्रीत बुमराह या दोघांना काल शनिवारी सामन्याच्या तिसऱ्या दिवशीशिव्या दिल्या असल्याचं प्रकरण समोर आलं होतं. या सर्व प्रकरणाबाबत टीम इंडियाकडून सामनाधिकाऱ्यांकडे तक्रार करण्यात आली होती. परंतु त्याचा काहीही परिणाम झाला नाही. याआधी भारतीय खेळाडूंनी रेस्टॉरंटमध्ये जाऊन जेवण केल्यानंतर देखील वाद निर्माण झाला होता. हा वाद चालू असतानाच आणखी एक नाव वाद निर्माण झाला आहे.
मंकीगेट प्रकरणाची होणार पुनरावृत्ती?
सिडनी कसोटी 2008 मंकीगेट कोणी विसरलंय का ? हरभजन सिंग आणि अँड्रू सायमंड्स या दोघांमध्ये वाद झाला होता. चालू असलेल्या वादात हरभजनने सायमंड्सला माकड म्हणल्याची तक्रार समोर आली होती. ही बाब इतकी वाढली की ऑस्ट्रेलियन टीमने भारत दौर्यावर बहिष्कार टाकण्याचा विचार सुरू केला होता.
असाच एक वाद सध्याच्या भारतीय संघाच्या ऑस्ट्रेलिया दौर्यावरही निर्माण झाला असून चारही बाजूंकडून आलेल्या प्रतिक्रियांनंतर हा वाद आता वाढतांना दिसत आहे.
त्यातच प्रोटोकॉल तोडल्याच्या आरोपा नंतर सिडनीनंतर ब्रिस्बेनमध्ये चौथा कसोटी सामना खेळण्यास भारतीय संघाने टाळाटाळ केली होती. त्याला उत्तर देताना क्वीन्सलँड सरकारने जोरदार प्रत्युत्तर दिले की भारतीय खेळाडू जर नियमांचे पालन करू शकत नाहीत तर त्यांना ब्रिस्बेनमध्ये येण्याची गरज नाही. त्यांच्या निर्णयाबद्दल आपण आणखी काही करू शकत नाही.
ब्रिस्बेन कसोटी खेळणार नाही – भारतीय संघ व्यवस्थापन
रविवारी अहवाल आला की भारतीय संघ ब्रिस्बेनला जाण्यास उत्सुक नाही. भारतीय संघ व्यवस्थापनाने सांगितले की जर त्यांच्या खेळाडूंना वेगळे ठेवण्यास भाग पाडले गेले तर ते ब्रिस्बेनला जाणार नाहीत.
भारतीय टीम मॅनेजमेंटचे म्हणणे आहे की, सर्व भारतीय खेळाडूंनी 14 दिवसांची अलिप्तता पूर्ण केली आहे. संघातील अंतर्गत गट असे म्हणतात की यापुढे संघाला खेळाडूंवर अधिक निर्बंध आहेत. म्हणूनच चौथा कसोटी सामना सिडनीमध्येही खेळला जावा, असा भारतीय संघाचा विश्वास आहे.
क्वीन्सलँड सरकारचे प्रतिउत्तर
परंतु क्वीन्सलँड सरकारने हे स्पष्ट केले की नियमांचे उल्लंघन करणे आपल्यासाठी पर्याय असू शकत नाही. राज्याचे आरोग्यमंत्री रॉस बेट्स म्हणाले, “जर भारतीय संघ नियमानुसार चालवू शकत नसेल तर त्यांनी ब्रिस्बेनला येऊ नये.” या व्यतिरिक्त क्वीन्सलँडचे क्रीडामंत्री टिम मॅन्डर यांनीही बेट्सच्या मुद्याचे समर्थन केले की,
“कोणत्याही परिस्थितीत प्रोटोकॉल तोडण्यासाठी जागा नाही. प्रत्येक खेळाडूला नियमांनुसार चालत जावे लागते. जर भारतीय संघ ब्रिस्बेनमधील संगरोध मार्गदर्शक सूचनांचे पालन करू शकत नसेल तर त्यांनी येथे येऊ नये. हा प्रत्येकासाठी नियम असेल.
महत्वाच्या बातम्या
- देवेंद्र फडणवीसांच्या सुरक्षेत कपात तर, आठवलेंच्या सुरक्षेत वाढ : ठाकरे सरकारचा मोठा निर्णय
- अनेकदा ऑस्ट्रेलिया चाहत्यांकडून रंगावरून टिप्पणी होते; वर्णद्वेषीच्या टीकेवरून क्रिकेटपटू भडकले
- आजारी कर्मचाऱ्याला भेटण्यासाठी रतन टाटा मुंबईहून पुण्यात पोहोचले, पण…
- वढु बुद्रूक येथील छत्रपती संभाजी महाराजांच्या समाधीस्थळाला भिडे गुरुजींची भेट
- भंडारा घटनेतील सुरक्षित स्थळी हलविण्यात आलेल्या बालकांमध्ये जुळ्यांचाही समावेश
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

