Share

शेतकरी आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी काँग्रेसची राज्यभरात ठिकठिकाणी आंदोलनं

Published On: 

🕒 1 min read

लातूर : केंद्र सरकारच्या सुधारित कृषी कायद्याच्या विरोधात पंजाबमधल्या शेतकऱ्यांच्या दिल्लीत सुरु असलेल्या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर, केंद्र सरकारनं काल शेतकऱ्यांसोबत चौथ्या टप्प्यातली चर्चा केली, आणखी काही मुद्यांवर पुढे चर्चा केली जाणार असल्याचं केंद्र सरकारकडून सांगण्यात आलं.

दरम्यान, या आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी काँग्रेस आणि अन्य संघटनांनी काल राज्यात ठिकठिकाणी आंदोलनं केली. औरंगाबाद इथं जिल्हाधिकारी कार्यालयासमोर तर हिंगोली शहरामध्ये महात्मा गांधी पुतळा परिसरात काँग्रेस पक्ष कार्यकर्त्यांनी निदर्शनं केली.नगर,लातूर ,धुळे, जळगाव, बुलडाणा, नाशिक, मुंबई इथंही आंदोलन करण्यात आलं.

दरम्यान, शेतकऱ्यांशी सर्व मुद्यांवर चर्चा करायला केंद्र सरकार तयार असून त्यांच्या हिताचं रक्षण करण्यासाठी सरकार कटिबद्ध आहे, अशी ग्वाही केंद्रीय कृषिमंत्री नरेंद्र सिंग तोमर यांनी काल पुन्हा दिली. नवीन कृषी कायद्याबाबत शेतकऱ्यांच्या प्रतिनिधींशी चर्चेची चौथी फेरी काल नवी दिल्लीत झाली,त्यानंतर ते प्रसिद्धी माध्यमांशी बोलत होते.

या चर्चेत केंद्र सरकारच्या वतीनं तोमर यांच्यासह वाणिज्य मंत्री पियुष गोयल हेही उपस्थित होते. आजची चर्चा चांगल्या वातावरणात झाली आणि चर्चेची पुढची फेरी येत्या ५ तारखेला शनिवारी होईल, असं तोमर यांनी यावेळी सांगितलं.

महत्वाच्या बातम्या 

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!