Share

शेतकरी मित्राना पाठबळ द्या, खासदार भावना गवळींचा ‘या’ संस्थेला निर्देश

Published On: 

वाशीम : यावर्षी कोरोनाच्या संकटामुळे शेतकरी पुरता अडचणीत आला आहे. अशा कठिण काळात बँकेने शेतकऱ्यांच्या पाठीशी उभे राहिले पाहिजे. बँक प्रशासनाने अर्जदार शेतकऱ्यांना तत्काळ कर्जपुरवठा करावा, असे निर्देश खासदार भावना गवळी यांनी दिले आहेत.

जिल्ह्यात मार्च महिन्यापासून कोरोनाचा प्रादुर्भाव वाढतो आहे. शेतकरी कष्टकरी यांच्या अडचणी वाढल्या आहेत. मात्र, राज्याचे लोकाभिमुख नेतृत्व मुख्यमंत्री उध्वव ठाकरे यांनी शेतकऱ्यांना कर्जमुक्त केले आहे. आता या खरिप हंगामात शेतकऱ्यांना पिककर्ज वाटपाची गती अतिशय धिमी असल्याने शेतकरी सावकाराच्या जाळ्यात सापडला आहे.

गृहमंत्रीच विसरले शिवछत्रपतींचे नाव ? शिवप्रेमींच्या संतप्त प्रतिक्रिया…

या पार्श्ववभूमीवर बँकांनी शेतकऱ्यांना तत्काळ कर्जपुरवठा करावा, असे आवाहन खासदार भावना गवळी यांनी केले आहे. या संदर्भात त्यांनी जिल्हा बॅकेच्या अधिकाऱ्यांना निर्देश दिले आहेत. ज्या शेतकऱ्यांनी ३१ ऑगस्टच्या आत पिककर्ज घेण्यासाठी अर्ज केले हे अर्ज प्रलंबित राहीले अशा शेतकऱ्यांना तत्काळ कर्जपुरवठा करावा, असे निर्देश खासदार भावना गवळी यांनी दिले आहेत.

मुलापाठोपाठ आबांच्या पत्नी आमदार सुमन पाटील यांना देखील कोरोनाची लागण

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!