मुंबई : कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेता आजपासून विधिमंडळाच्या पावसाळी अधिवेशनाला सुरुवात होणार आहे. हे.या अधिवेशनात केवळ दोन दिवस कामकाज होणार आहे. तसेच विधानसभेचे अध्यक्ष नाना पटोले यांना कोरोनाची लागण झाल्याने ते या अधिवेशनाला उपस्थित राहणार नाहीत, त्यामुळे उपाध्यक्ष नरहरी झिरवळ यांच्या अध्यक्षतेखाली अधिवेशन पार पडेल, अशी माहिती संसदीय कार्यमंत्री अनिल परब यांनी दिली आहे.
भाजपकडून पांडुरंग रायकर यांच्या कुटुंबियांना ५ लाखाची मदत!
या अधिवेशनाच्या पहिल्या दिवशी देशाचे माजी राष्ट्रपती ,भारतरत्न दिवंगत प्रणव मुखर्जी तसेच राज्याचे माजी मुख्यमंत्री शिवाजीराव निलंगेकर पाटील यांच्यासह दिवंगत सदस्यांच्या निधनाचा शोक प्रस्ताव मांडण्यात येणार आहे त्यानंतर विधायके मांडण्यात येतील. दरम्यान खबरदारीसाठी दोन्ही सभागृहाचे सदस्य, विधिमंडळाचे कर्मचारी, आमदारांचे स्वीय सहायक व पत्रकारांची चाचणी करण्यात आली असून यात फक्त विधेयके व पुरवणी मागण्या मांडल्या जातील. प्रश्नोत्तरांचा तास व लक्षवेधी या अधिवेशनात होणार नाही.


