🕒 1 min read
मुंबई : राज्य राखीव पोलीस बलातून(SRPF) राज्य पोलीस दलात बदलीकरिता आवश्यक सेवेची पंधरा वर्षाची अट शिथिल करुन बारा वर्ष करण्याचा तसेच प्रतिनियुक्तीच्या अटी शर्तीमध्ये बदल करण्याचा निर्णय गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांच्या अध्यक्षतेखाली व पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांच्या उपस्थितीत झालेल्या बैठकीत घेण्यात आला.
एसआरपीएफ जवानांसाठी घेतलेल्या या दिलासादायक निर्णयाबद्दल मंत्री आदित्य ठाकरे यांनी गृहमंत्र्यांचे आभार मानले आहेत. या निर्णयासाठी आदित्य ठाकरे यांनी पाठपुरावा केला होता. त्यांच्या विनंतीवरुन एसआरपीएफ जवानांच्या या प्रश्नाबाबत समितीही गठीत करण्यात आली होती. या समितीच्या शिफारशीनुसार आज झालेल्या बैठकीत यासंदर्भात निर्णय घेण्यात आला.
या निर्णयामुळे एसआरपीएफ जवानांची दीर्घकालीन मागणी पूर्ण झाली आहे. निर्णयामुळे एसआरपीएफ जवानांचे मनोबल उंचावणार असून अधिक कार्यक्षमतेने कर्तव्य बजावण्यासाठी प्रोत्साहन मिळणार आहे. या निर्णयाबद्दल मंत्री ठाकरे यांनी गृह विभागाचे अपर मुख्य सचिव मनूकुमार श्रीवास्तव, पोलीस महासंचालक संजय पांडे, अतिरिक्त पोलीस महासंचालक अर्चना त्यागी यांचेही आभार मानले आहेत.
दरम्यान, अहवालातील शिफारशीनुसार राज्य राखीव पोलीस बलातून जिल्हा पोलीस दलात दाखल होणेसाठी पूर्वीची पंधरा वर्ष सेवा पूर्ण ऐवजी बारा वर्ष अशी अट करावी. तसेच बदली झाल्यानंतर पहिले पाच वर्ष जिल्हा पोलीस मुख्यालयात कर्तव्य करावे लागत आहे. त्यामध्ये बदल करुन हा कालावधी दोन वर्ष करावा असा निर्णय घेण्यात आला आहे.
महत्वाच्या बातम्या
- योगींच्या राज्यात परिस्थिती हाताबाहेर, रुग्णांना घरुनच आणाव्या लागत आहेत खाटा
- अहिल्यादेवी होळकरांची तुलना ममता बॅनर्जींशी करणाऱ्या संजय राऊतांनी जनतेची माफी मागावी! जय मल्हार सेनेची मागणी
- पवित्र रमजानचा सण साध्या पध्दतीने साजरा करा! अब्दुल सत्तार यांचे मुस्लिम बांधवांना आवाहन
- ‘तुम्ही सगळे महाराज एकत्र या; मग होऊन जाऊद्या आमने-सामने’; शिवसेना आमदाराची मुक्ताफळं
- काळजी घ्या : राज्यात कोरोना रुग्णांमध्ये सलग दुसऱ्या दिवशी मोठी वाढ
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
