औरंगाबाद : शालेय विद्यार्थ्यांचे आधार लिंक करण्याचे काम सुरू आहे. मात्र आधार लिंक करत असतांना जिल्ह्यातील ७४८६ विद्यार्थ्यांची नावे दोन-दोन शाळेत आढळून आली आहेत. त्यामुळे जिल्ह्यात एकच खळबळ उडाली आहे. संबंधित केंद्र प्रमुखांवर कारवाई करण्याचे आदेश जि.प.चे शिक्षण सभापती अविनाश गलांडे यांनी दिले आहेत. मात्र या पाठीमागे मुख्य सूत्रधार कोण याचा शोध अजूनही लागलेला नाही.
शालेय विद्यार्थ्यांना राज्य सरकारच्या विविध योजनांचा लाभ देण्यासाठी आधार लिंक करण्याचे काम सध्या मोठ्या प्रमाणावर सुरू आहे. हे काम सुरू असतानाच जवळपास ७४८६ विद्यार्थ्यांची नावे दोन ठिकाणी असल्याचे आढळून आली आहेत. जिल्हा परिषद व खाजगी संस्थांच्या शाळांमध्ये ही नावे असल्याचे दिसून येत आहे. जि.प. शिक्षण समितीच्या सभापती अविनाश गलांडे यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीत हि घटना उघड झाली आहे. पटसंख्या वाढवून शिक्षकांची पदे वाचविण्यासाठी हा प्रकार झाल्याचे समोर आले आहे.
दरम्यान, यामुळे जवळपास २५० शिक्षकांची पदे वाचलेली आहेत. आता डबल नावे असल्यानंतर २५० शिक्षक अतिरिक्त ठरणार आहेत. दरम्यान, हा डबल गेम करण्यासाठी शिक्षण विभागाचे कोण जबाबदार आहेत? याचा शोध सुरू असल्याचे सभापती गलांडे यांनी सांगितले. या संदर्भात केंद्रप्रमुखांकडून खुलासा मागविला असून, तो समाधानकारक आला नाही तर त्यांच्यावर कारवाई करण्याचे आदेश सभापती गलांडे यांनी बैठकीत दिले. दरम्यान, गावात असताना एक आधार आणि उसतोडीसाठी किंवा इतर कामासाठी बाहेरगावी गेल्यावर त्याठिकाणीही आधारची नोंदणी केली असावी, असा अंदाज वर्तवला जात आहे, असे प्रशासनाकडून सांगितले जात आहे.
महत्त्वाच्या बातम्या
- ‘महाविकास आघाडीच्या नेत्यांना स्वतःच्या खुर्च्या उबविण्यातच जास्त रस आहे’, चित्रा वाघ यांचा हल्लाबोल
- सुडभावनेने कितीही कारवाया झाल्या तरी मराठ्यांच्या हक्काचा लढा लढणारच; मराठा आंदोलकाचा ‘ठाकरे सरकार’ला इशारा!
- शाहरुख खानचा मुलगा आर्यन खानला एनसीबीकडून अटक
- शिवसेना, शिवसैनिक आपल्या पाठीशी खंबीर; फक्त हाक द्या, आ. दानवेंचे शेतकऱ्यांना आश्वासन!
- ‘राष्ट्रवादीने अजितदादांना मुख्यमंत्रिपद द्यायला हवे!’, भाजप नेत्या चित्रा वाघ यांची मागणी
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

