Share

नागरिकांसाठी लस पुरवण्याबाबत शिवसेना खा.ओमराजे निंबाळकरांचे मोदींना पत्र

Published On: 

उस्मानाबाद : महाराष्ट्रात कोरोनाचा संसर्ग मोठ्या प्रमाणात फैलावत आहे. उस्मानाबाद लोकसभा मतदारसंघातील गावांमध्ये कोरोना संक्रमित रुग्णांची संख्याही वाढत आहे. या पार्श्वभूमीवर लसीकरणाची नितांत गरज असून केंद्र सरकारने ४५ वर्षावरील वयोगटासाठी लस पुरवठा करावा, अशी मागणी खासदार ओमप्रकाश राजेनिंबाळकर यांनी पत्राद्वारे पंतप्रधान नरेंद्र मोदी, आरोग्यमंत्री डॉ. हर्षवर्धन यांच्याकडे केली आहे.

ओमराजे यांनी म्हटले आहे की, केंद्र व राज्य सरकारच्या मार्गदर्शक नियमानुसार सध्या ४५ वर्षे वयोगटावरील सर्व नागरिकांना लसीकरणासाठी पहिला व दुसरा डोस जिल्ह्यात ९,३१,७७४ नागरिकांना देणे बाकी आहे. औसा व निलंगा तालुक्यात २,६,८०२ तसेच सोलापूर जिल्ह्यातील बार्शी तालुक्यात एक लाख १ हजार २ नागरिकांना देणे बाकी आहे, म्हणजेच लोकसभा मतदारसंघात १२ लाख ३९ हजार ५७८ लस देणे आवश्यक आहे.

परंतू आतापर्यंत मतदारसंघात २,२५,७१६ लस उपलब्ध झाली. आणखी १० लाख १३ हजार ८६२ लसींची गरज आहे. महाराष्ट्र शासन केंद्राकडे ४५ वर्षांवरील पहिला डोस घेतलेल्या नागरिकांना दुसऱ्या डोस देण्यासाठी लस उपलब्ध करून देण्यासंदर्भात वारंवार मागणी करत आहे. परंतु केंद्र सरकार दुर्लक्ष करत आहे. केंद्र सरकारने ४५ वर्षे वयोगटावरील सर्व नागरिकांना लसीकरण करण्यासाठी जलद व मोठ्या प्रमाणात लस पुरवठा उपलब्ध करावी.

महत्वाच्या बातम्या 

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!