Share

गौतम गंभीरच्या विजयी निकालावर पाकिस्तानच्या आफ्रिदीचा जळफळाट

Published On: 

टीम महाराष्ट्र देशा : या लोकसभा निवडणुकीत मोदी लाटेत क्रिकेटर गौतम गंभीर याने देखील आपले हात ओले करून घेतले आहेत.दिल्लीच्या पूर्व दिल्ली मतदारसंघातून भाजपकडून उमेदवारी मिळवत आणि निवडणूक जिंकत राजकारणात धमाकेदार एन्ट्री मारली आहे. मात्र गौतम गंभीर च्या विजयी निकालावर पाकिस्तानचा माजी क्रिकेटर शहीद आफ्रिदी याने टिका केली आहे.दिल्लीकरांनी एका अक्कल नसलेल्या माणसाला निवडून दिले आहे, अशी टीका आफ्रिदीने केली आहे. आफ्रिदी आज पत्रकार परिषदेमध्ये बोलत होता.

यावेळी आफ्रिदी म्हणाला की, पुलवामा हल्ल्यानंतर भारताने पाकिस्तानशी कुठल्याही प्रकारचे संबंध ठेवू नयेत. तसेच विश्वचषकातही पाकिस्तानविरोधात सामना खेळू नये असे गंभीरने म्हटले होते. त्याला प्रत्युत्तर देताना आफ्रिदीने हे वक्तव्य केले. ”असे विधान गौतम गंभीरने केले असेल तर त्याच्या अकलेवरून वाटतं का त्याने कुठली शहाणपणाची गोष्ट केली आहे, असे वाटते का? सुशिक्षित लोक अशी वक्तव्ये करतात का? त्याने केलेले वक्तव्य मुर्खपणाचे आहे आणि लोकांनी अशा व्यक्तीला मतदान केले आहे, ज्याला अक्लल नाही.

दरम्यान क्रिकेटच्या मैदानावरील गौतम गंभीरची कामगिरी ही साऱ्यांना माहित आहे, तसेच आता राजकारणाच्या मैदानात देखील त्याने सफाईने यश संपादन केले आहे. त्यामुळे त्याचा प्रतिस्पर्धी आणि पाकिस्तान संघाचा माजी क्रिकेटर शहीद आफ्रिदीचा जळफळाट झाला आहे.

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!