Share

राज्यात सरपंचाची निवड आता पूर्वीप्रमाणेच सदस्यांमधून होणार

Published On: 

टीम महाराष्ट्र देशा – राज्यात आता सरपंचांची निवड लोकांमधून थेट निवडणुकीऐवजी, निवडून आलेल्या सदस्यांमधूनच करण्याचा निर्णय आज झालेल्या राज्य मंत्रिमंडळ बैठकीत घेण्यात आला.

या दृष्टीने महाराष्ट्र ग्रामपंचायत अधिनियमामधील कलम ७, कलम १३, कलम १५ , कलम ३५, कलम ३८, कलम ४३, कलम ६२, कलम ६२अ मध्ये सुधारणा व कलम ३० अ-१ ब व कलम १४५-१ अ चा नव्याने समावेश करण्यासाठी मंत्रिमंडळाने मान्यता दिली.

तसेच खर्चाच्या विवरणाच्या संदर्भात सुधारित वेळापत्रकात बदल करण्यास मंजुरी देण्यात आली. संबंधित कायद्यामध्ये सुधारणा करण्यासाठी अध्यादेश काढण्यात येईल. याबाबतची माहिती मुख्यमंत्री कार्यालयाच्या अधिकृत ट्वीटर अकाऊंट वरून देण्यात आली.

हेही बघा – 

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!