मुंबई : गेले काही दिवस राज्याच्या राजकारणात वादळी ठरत आहेत. शिवसेना विरुद्ध कंगना रणौत सामना आता तापला असून इतके दिवस शिवसेना खासदार संजय राऊत यांना भिडणाऱ्या कंगनाने शिवसेना पक्षप्रमुख व राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनाच थेट आव्हान दिल आहे.
कंगनाच्या कार्यालयावर करण्यात आलेली कारवाई ही राजकीय सुडबुद्धीने करण्यात आल्याचे आरोप शिवसेनेसह राज्य सरकार व बीएमसीवर करण्यात आले आहेत. सुशांत सिंह राजपूत प्रकरणाच्या तपासावरून मुंबई पोलीस व व्यवस्थेविरुद्ध आवाज उठवल्याने ही कारवाई केली जात असल्याची टीका करत कंगनाने मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंचा एकेरी उल्लेख केला आहे.
दुसरीकडे एका खाजगी वृत्तवाहिनीचा संपादक अर्णब गोस्वामी याने देखील गेले अनेक दिवस मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंसह संजय राऊत व शिवसेनेवर सातत्याने टीका केली आहे. काल एका चर्चेदरम्यान अर्णब गोस्वामीने ‘संजय राऊत कार्टून कॅरॅक्टर असून तो कॉमेडी शो चालवतो’ असा एकेरी उल्लेख केला आहे. गोस्वामीने याआधी देखील मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंचा या प्रकरणात एकेरी उल्लेख केल्याने अर्णब गोस्वामी विरोधात आक्रमक भूमिका घेतली होती.
महत्वाच्या बातम्या:-
लॉकडाऊनमुळे साई संस्थानच्या देणगीत १८२ कोटींची घट!
विदर्भ व मराठवाड्यातील प्रलंबित कृषीपंप वीज जोडण्या देण्यासाठी एशियन डेव्हलपमेंट बँकेकडून घेणार कर्ज
एका एका खाटेसाठी जातोय कोरोना रुग्णांचा जीव, काँग्रेसच्या आमदाराची अजित पवारांकडे ‘ही’ मागणी
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

