Share

ईडीच्या धाडींवर संजय राऊतांची प्रतिक्रिया; म्हणाले, ‘आम्ही हा त्रास सहन करायला…’

Published On: 

🕒 1 min read

मुंबई : काही दिवसांपूर्वीच आर्थिक गैरव्यवहार प्रकरणी ईडीकडून राष्ट्रवादीचे नेते आणि अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक (Nawab Malik) यांना अटक करण्यात आली. तसेच मुंबई महानगरपालिकेचे स्थायी समिती अध्यक्ष यशवंत जाधव यांच्या घरी प्राप्तीकर विभागाने छापा टाकला. या प्रकरणानंतर राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आल्याचे बघायला मिळाले. दरम्यान, याच मुद्द्यावरून शिवसेना खासदार संजय राऊत यांनी भाजपवर निशाणा साधत टीकास्त्रांचा वर्षाव केला आहे.

यासंदर्भात प्रसार माध्यमांशी संवाद साधत असतांना संजय राऊत म्हणाले की,‘केंद्र सरकारला वाटत आहे की इन्कम फक्त महाराष्ट्रातच आहे. सर्वाधिक टॅक्स मुंबई आणि महाराष्ट्रच देतो. महाराष्ट्राच्या लोकांना अशा प्रकारे त्रास देणे केंद्रीय तपास यंत्रणांच्या माध्यमातून छळ करणं याची नोंद महाराष्ट्रातली जनता घेतेय’, असे राऊत म्हणाले.

दरम्यान, पुढे ते म्हणाले की, ‘मुंबई महानगर पालिकेच्या निवडणुका डोळ्यांसमोर ठेवून अशा प्रकारे बदनामीची मोहीम सुरू आहे. परंतु फार काळ हे चालणार नसून आमचे लक्ष आहे. आम्ही हा त्रास सहन करायला तयार आहोत. पण महाराष्ट्र वाकणार नाही’, असेही राऊत यावेळी म्हणाले.

महत्वाच्या बातम्या : 

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!