Sanjay Raut । मुंबई : पत्राचाळ (Patrachawl Scam) घोटाळ्या प्रकरणी तब्बल १०२ दिवस अटकेत असलेल्या शिवसेना खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांचा अखेर जामीन झाला आहे. मोठ्या जल्लोषात संजय राऊतांचा जामीन साजरा करण्यात आला होता. यानंतर संजय राऊत यांनी राज ठाकरे यांच्या वक्तव्याला प्रत्युत्तर दिलं आहे.
काही दिवसांपूर्वीच मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी “राऊतांनी आता एकांतात बोलण्याची प्रॅक्टिस करावी”, अशी बोचरी टीका केली होती. त्याला आज संजय राऊतांनी प्रत्युत्तर दिले आहे. उद्धव ठाकरेंच्या भेटीला जाण्यापूर्वी संजय राऊत यांनी माध्यमांशी संवाद साधला. यावेळी ते बोलत होते.
ते म्हणाले, “मनसे प्रमुख आणि माझे मित्र राज ठाकरे यांनी एका ठिकाणी बोलताना माझ्यावर टीका केली होती. संजय राऊतांवर आता ईडीने कारवाई सुरू केली आहे. त्यांनी आता एकांतात बोलण्याची सवय लावून घ्यावी, असे ते म्हणाले होते. मात्र, मला त्यांना एवढंच सांगायचं आहे, की मी कारागृहात एकांतात होतो. वीर सावरकरही तुरुंगात असताना एकांतात होते. लोकमान्य टिळक तसेच आणीबाणीच्या काळात अनेक नेते एकांतात होते.”
पुढे ते म्हणाले, “माझी अटक ही राजकीय होती आणि मी माझा एकांतातला काळ सत्कर्मी लावला आहे”, असं सांगत संजय राऊतांनी राज ठाकरेंना प्रत्युत्तर दिलं आहे. यावर आता राज ठाकरे काय प्रतिक्रिया देतात का? हे पाहावं लागणार आहे.
महत्वाच्या बातम्या :
- Sanjay Raut | शहा अन् मोदींची भेट घेणार असल्याचं सांगत संजय राऊतांनी केलं देवेंद्र फडणवीसांचं कौतुक
- T20 World Cup | टी 20 वर्ल्ड कपमध्ये तीनदा आमने-सामने आले आहे भारत-इंग्लंड
- Anand Dave | “औरंंगजेब, अफजलखानाच्या कबरी नेस्तनाबूत करा नाहीतर…”; हिंदू महासंघाचा राज्य सरकारला इशारा
- Sharad Ponkshe | “सत्ता गेली म्हणून…”, शिंदे गटातील अभिनेते शरद पोंक्षें राष्ट्रवादीवर कडाडले
- T20 World Cup | भारत-इंग्लंड उपांत्य फेरी दरम्यान पावसाची शक्यता?


