मुंबई: काँग्रेस नेते सचिन सावंत (sachin sawant)यांनी ट्वीट करत मोदी सरकारवर निशाना साधला आहे. त्यांनी नीती आयोगाने प्रसिद्ध केलेल्या अहवालावरून मोदी सरकारच्या विविध योजना तसेच महागाई,गरिबी,बेरोजगारी , स्वच्छता यावरून टीका केली आहे.
नीती आयोगाने नुकताच एक अहवाल प्रसिद्ध केला आहे. ज्यामध्ये म्हटले आहे की, देशातील ५८.५% जनता स्वयंपाक गॅसपासून वंचित आहे. तसेच ५२% शौचालय स्वच्छतेपासून वंचित. तर १४.६% जनता पिण्याच्या पाण्यापासून वंचित आहे. तर अजूनही ४५.६% जनता घरांपासून वंचित आहे. एकीकडे भाजप सरकारकडून वेगवेगळ्या योजनांबद्दल बोलले जाते तर दुसरीकडे देशात तब्बल ४५.६% नागरिक घरांपासून वंचित आहे.
निती आयोगाने मोदी सरकारच्या प्रपोगांडाचा व बेगडी राष्ट्रवादाचा बुरखा टराटरा पाडला आहे.
१.देशातील ५८.५% जनता स्वयंपाक गॅसपासून वंचित
२. ५२% शौचालयादी स्वच्छतेपासून वंचित
३. १४.६% पिण्याच्या पाण्यापासून वंचित
४. ४५.६% घरांपासून वंचित
५. ९.७% जनता बँक खात्यांपासून वंचित आहे pic.twitter.com/AEtEhB2OVx— Sachin Sawant सचिन सावंत (@sachin_inc) December 4, 2021
दरम्यान यावरूनच काँग्रेस नेते सचिन सावंत यांनी मोदी सरकारवर टीका केली आहे. नीती आयोगाचा हा अहवाल म्हणजे मोदी सरकारच्या प्रपोगांडाचा व बेगडी राष्ट्रवादाचा बुरखा टराटरा फाडला असल्याची टीका त्यांनी ट्वीट करत केली आहे.
महत्वाच्या बातम्या
- ‘मोदींच्या पक्षाला एनडीएची गरज नाही, पण विरोधकांना यूपीएची गरज आहे’
- ‘लस नाही तर बस नाही,डोकं आहे पण मेंदू नाही’ संदीप देशपांडेंचा खोचक टोला
- काँग्रेसने लोकसभेत शंभरी पार केल्याशिवाय राष्ट्रीय पातळीवरील ‘गेम चेंज’ होणार नाही- शिवसेना
- भारतात ओमायक्रॉन आढळल्यास आश्चर्य वाटणार नाही- डॉ. समीरन पांडा
- …यासाठी गुजरातचे मुख्यमंत्री मुंबईत आलेत का?- संजय राऊत


