Share

५ वेळा खासदार म्हणून निवडून आलेल्या कॉंग्रेसच्या ‘या’ माजी कॅबिनेट मंत्र्याचे निधन

Published On: 

टीम महाराष्ट्र देशा- माजी केंद्रीय मंत्री काँग्रेसचे जेष्ठ नेते एस. जयपाल रेड्डी यांचं आज पहाटे दीड वाजेच्या सुमारास हैदराबाद इथं निधन झालं. ते ७७ वर्षांचे होते. श्वसनाचा त्रास होत असल्यामुळं त्यांना रूग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. काँग्रेस आणि जनता पक्षाच्या माध्यमातून त्यांनी पक्षीय राजकारण केलं.

जयपाल रेड्डी यांचा जन्म १६  जानेवारी १९४२  मध्ये हैदराबादमधील मदगुलमध्ये झाला होता. सध्या हे तेलंगना राज्यात येते. जयपाल रेड्डी यांच्यामागे एक मुलगी आणि दोन मुले आहेत. यूपीए सरकारच्या काळात जयपाल रेड्डी यांनी कॅबिनेट मंत्री म्हणून पदभार सांभाळला होता. आंध्रप्रदेशात जयपाल रेड्डी चारवेळा आमदार आणि ५ वेळा खासदार म्हणून निवडून आले होते.

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!