Share

Rohit Pawar | “कोंबडं झाकलं म्हणून सूर्य उगवायचा रहात नाही”; रोहित पवारांचा विरोधकांना इशारा

Published On: 

🕒 1 min read

Rohit Pawar |  अहमदनगर :  राज्यातील राजकीय वातावरण चांगलंच तापलेलं आहे. ठाकरे विरुद्ध शिंदे गटात कलगीतुरा रंगलेला असतानाच दुसरीकडे सत्ताधारी पक्षांवर टीका करण्याची एकही संधी विरोधक सोडत नाहीयेत. अशातच राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार रोहित पवार (Rohit Pawar) यांनी शिंदे-फडणवीस सरकारवर ट्विटच्या माध्यमातून जोरदार टीका केली आहे.

रोहित पवार म्हणाले, “राज्याबाहेर जाणाऱ्या प्रकल्पांवरून युवांमध्ये वाढणारा तीव्र असंतोष आणि #BharatJodo यात्रेला मिळणाऱ्या तुफान प्रतिसादामुळं धडकी भरल्याने मीडियाचं लक्ष हटवण्यासाठी विरोधकांवर खोटे गुन्हे दाखल केले जात असल्याची चर्चा आहे. पण लक्षात ठेवा…कोंबडं झाकलं म्हणून सूर्य उगवायचा रहात नाही.!” अशा आशयाचं ट्विट रोहित पवार (Rohit Pawar) यांनी केलंय.

 

काँग्रेसचे नेते राहुल गांधी (Rahul Gandhi) यांच्या नेतृत्वाखाली भारत जोडो पदयात्रा सध्या महाराष्ट्रात आहे. महाविकास आघाडीमधील काँग्रेसचे मित्र पक्ष असलेल्या शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेसनेही या भारत जोडो यात्रेचे स्वागत केले आहे. यात्रेला मिळणाऱ्या प्रतिसादामुळे सत्ताधाऱ्यांना धडकी भरली असल्याचं पवार म्हणालेत.

राष्ट्रवादीचे नेते रोहित पवार यांनी जितेंद्र आव्हाडांच्या अटकेचा निषेध व्यक्त केला होता. तसेच संजय राऊत (Sanjay Raut) यांच्यावरील कारवाईबाबत देखील रोहित पवारांनी सत्ताधाऱ्यांना सुनावलं होत. याचा संदर्भ जोडत त्यांनी हे ट्विट केले आहे.

महत्वाच्या बातम्या :

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!