Share

पुढच्या आषाढी वारीपर्यंत मराठा समाजाला आरक्षण देणार, अन्यथा मंत्रीपदाचा राजीनामा देऊ – देशमुख

Published On: 

टीम महाराष्ट्र देशा – सोलापूर जिल्ह्यात मराठा मोर्चाच्या आंदोलनाची धग तीव्र होत आहे. आज सकाळी जिल्ह्यात ठिकठिकाणी चक्का जाम सुरु झाले आहे. आंदोलकांनी सहकारमंत्री सुभाष देशमुख यांची सोलापूर मंगळवेढा महामार्गावर सकाळी दहा वाजता गाडी अडविली. पुढच्या आषाढी वारीपर्यंत मराठा समाजाला आरक्षण देणार, अन्यथा मंत्रीपदाचा राजीनामा देऊ असं आश्वासन देत सहकारमंत्री आंदोलकांच्या गराड्यातून कशीबशी सुटका करुन घेत निघून गेले.

नेमकं काय घडलं ?

माचणुर येथे आंदोलन सुरु असताना सहकार मंत्री सुभाष देशमुख हे या महामार्गावरून जात होते. यावेळी आंदोलनकर्त्यांनी त्यांचा ताफा अडवला. आंदोलकांच्या भावना तीव्र झाल्याचे निदर्शनास येताच त्यांनी आपल्या मोबाइलवरून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना फ़ोन करत थेट आंदोलकांशी बातचीत करून दिली. मात्र समाधानकारक उत्तर न मिळाल्याने आंदोलक संतापले. शेवटी पुढील आषाढ़ी पर्यंत आरक्षणाचा निर्णय होईल, नाही झाल्यास मी राजीनामा देईन असे सांगितले. त्यावर आंदोलकांनी पुढील वर्षी निवडणुका आहेत तुम्हाला राजीनामा देण्याची गरज राहणार नाही, असे सांगत तासभर सहकार मंत्र्याना सोडले नव्हते.

सरकार ‘मोदीं’चेच; संसदेतील अविश्वास दर्शक ठराव भाजपने जिंकला

विरोधकांनीही घेतला मुख्यमंत्र्यांकडील चहाचा आस्वाद – सुभाष देशमुख

 

 

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!