मुंबई : एकनाथ शिंदे यांच्या बंडानंतर महाराष्ट्र विधान भवनाच्या चौथ्या मजल्यावर असलेले शिवसेनेचे कार्यालय सील करण्यात आले होते. आता राज्यात नवे सरकार स्थापन झाल्यानंतर पावसाळी अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी ते उघडून उद्धव ठाकरे गटाकडे सोपवण्यात आले. त्याचवेळी शिंदे गटाला सातव्या मजल्यावर कार्यालय देण्यात आले आहे. या ताज्या घटनेनंतर महाराष्ट्राच्या राजकारणात पुन्हा एकदा या चर्चेला जोर आला आहे की, शिवसेना कोणाची?
एकनाथ शिंदे यांनी मोठ्या संख्येने आमदारांसह शिवसेनेत बंड केला. त्यानंतर राज्यात नवे सरकार स्थापन झाले. एकनाथ शिंदे मुख्यमंत्री आणि देवेंद्र फडणवीस उपमुख्यमंत्री झाले.
शिंदे गटाला सातव्या मजल्यावर स्वतंत्र कार्यालय –
एकनाथ शिंदे सरकार एक महिन्याहून अधिक काळ मंत्र्यांच्या प्रतीक्षेत होते. मंत्रिमंडळ विस्ताराच्या विलंबामुळे बुधवारपासून सुरू झालेल्या पावसाळी अधिवेशनाच्या पहिल्या दिवशी शिंदे गटाला सातव्या मजल्यावर स्वतंत्र कार्यालय देण्यात आले. त्यामुळे चौथ्या मजल्यावर असलेले शिवसेनेचे मूळ कार्यालय उद्धव गटाच्या ताब्यात देण्यात आले.
उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेचे मूळ कार्यालय कायम-
विधानसभेत शिंदे गट मूळ शिवसेनेतून फुटला असताना, त्यांनीही प्रतोद नियुक्त करून मूळ शिवसेनेचा असल्याचा दावा केला आहे. असे असतानाही विधानभवनात शिवसेनेचे मूळ कार्यालय कायम ठेवून सातव्या मजल्यावर शिंदे गटाला स्वतंत्र कार्यालय दिल्याने नव्या चर्चेला सुरुवात झाली आहे.
महत्वाच्या बातम्या :
- Vidarbha । विदर्भात पावसाचे थैमान! गडचिरोली जिल्ह्यातील १८ तर भंडारा जिल्ह्यातील ७८ रस्ते वाहतुकीकरिता बंद
- bachchu kadu । आपला मंत्रिमंडळात समावेश होणार, मुख्यमंत्र्यांनी शब्द दिलाय – बच्चू कडू
- Shivsena । ठाकरेंच्या घराणेशाहीवर कालपर्यंत तुमच्या सत्तेचा डोलारा उभा होता, अन् तुम्ही…; शिवसेनेचा थेट मोदींवर निशाणा
- Shivsena । ‘वंदे मातरम् म्हणा’, ‘घर घर तिरंगा लावा’ असे फतवे काढायचे, अन्…; शिवसेनेची सडकून टीका
- Shivsena । उपाशी-तापाशी लोकांना ‘वंदे मातरम्’चे नारे द्यायला लावायचे, अन्…; शिवसेनेचा हल्लाबोल


