मुंबई : राज्यात सद्या मराठा आरक्षण, कोरोनाचा प्रसार, अनलॉकमधील सूट, अनेक धर्मातील येणारे सण-उत्सवाचं वातावरण, शेतकऱ्यांना मदत, मेट्रो कारशेड यासारखे अनेक विषय सद्या चर्चेचा मुद्दा ठरत आहे. तर, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर भाजपसह विरोधी पक्षांनी टीकास्त्र सुरूच ठेवलं आहे.
लॉकडाऊनपासून बंद करण्यात आलेली प्रार्थनास्थळे इतर सर्व गोष्टी सुरु केल्यानंतरही बंद असल्याने अनेक छोट्या-मोठ्या व्यवसायिकांचं नुकसान होत असून भाविक व देवाची ताटातूट केली जात असल्याचा आरोप करत भाजपने आक्रमक आंदोलनाचा बडगा उचलला आहे. तर, मनसेने देखील यावरून राज्य सरकारवर टीका केली होती.
आज मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी जनतेशी संवाद साधला. यावेळी त्यांनी सणांच्या शुभेच्छा देतानाच प्रार्थनास्थळे खुली करण्याबाबत देखील भाष्य केलं आहे. ‘दिवाळीनंतर मंदिरं खुली करणार असून त्यासाठी नियमावली बनवण्यात येईल. मंदिरासह इतर प्रार्थनास्थळांमध्ये ज्येष्ठ व्यक्ती, बालक जात असतात त्यामुळे तिथे त्यांच्या आरोग्याची काळजी घेणे महत्वाचे आहे आणि म्हणूनच जनतेच्या आरोग्यासाठी मला वाईटपणा घ्यावा लागत असेल तर मी वाईटपणा घेण्यास तयार आहे’ असं म्हणत त्यांनी विरोधकांच्या मागणीवर चपराक लगावला आहे.
महत्वाच्या बातम्या
- पवार साहेब फॅक्टर अमेरिकेत सुद्धा यशस्वी ठरलाय – जितेंद्र आव्हाड
- माझ्या जीवाला धोका आहे, माझ्यावर अन्याय होत आहे – अर्णब गोस्वामी
- लोकशाहीचं रक्षण करा आणि कधीही क्षुल्लक समजू नका! – अमृता फडणवीस
- ‘गोस्वामी यांच्या जीविताला काही धोका झाल्यास, त्याची जबाबदारी महाआघाडी सरकारची राहिल’
- राज्य सरकारने शिवाजी महाराजांचे नाव घेऊन त्यांना बदनाम करु नये- नारायण राणे
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

