टीम महाराष्ट्र देशा: वंचित बहुजन आघाडीचे आणि प्रकाश आंबेडकर हे भाजपला मदत करत असल्याची टीका कॉंग्रेस तसेच राष्ट्रवादीकडून केली जात आहे. यामध्ये आता भाजपचा मित्रपक्ष असणाऱ्या आरपीआयचे नेते रामदास आठवले यांची देखील भर पडली आहे.
आपण युतीचा घटक असून भाजप – शिवसेनेला उघडपणे पाठींबा दिला आहे. मात्र वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर हे छुप्या पद्धतीने युतीलाच मदत करणारी भूमिका घेत आहेत, असा दावा केंद्रीय समाजकल्याण राज्यमंत्री रामदास आठवले यांनी केला आहे. एका वृत्तपत्राशी बोलताना आठवले यांनी हा दावा केला आहे.
भाजपची साथ सोडणार नाही
लोकसभा निवडणुकीसाठी भाजपने आपल्या मित्रपक्षांना जागा सोडलेली नसल्याने ते नाराज आहेत. शनिवारी युतीतील मित्रपक्षाच्या नेत्यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेवून नाराजी व्यक्त केली आहे. यावेळी फडणवीस यांनी विधानसभा निवडणुकीत समाधानकारक जागा सोडण्याचे आश्वासन दिल्याने आरपीआय ( आ ) , रासप, शिवसंग्रामने शांत राहण्याची भूमिका घेतली आहे.
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
