Share

लहरी महाशयांचे ‘वसूली’ धंदे बंद करा- राम कदम

Published On: 

मुंबई : कोरोना रुग्ण संख्येत होत असलेल्या वाढीमुळे राज्यात कडक लॉकडाऊन लावण्याची तयारी राज्य सरकारने सुरू केली आहे. त्या संदर्भात सरकारचे मंत्री आणि मुख्यमंत्री देखील स्पष्ट संकेत देत आहे. दोन आठवड्यांचे लॉकडाऊन लागण्याची शक्यता आहे. त्यात आधी सर्वसामान्यांना पॅकेज द्या आणि नंतरच लॉकडाऊन लावा असे भाजप नेते राम कदम यांनी म्हटले आहे. इतकच नाही तर अनिल देशमुख प्रकरणावर त्यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर टीकाही केलीय.

लॉकडाऊनला सर्व पक्षांनी पाठिंबा द्यावा, असे आवाहन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केले आहे. मात्र, आधी आर्थिक पॅकेज द्या, नंतरच लॉकडाऊनची घोषणा करा, असे विरोधी पक्षांनी स्पष्ट केले आहे. त्यातच लॉकडाऊन लावण्याआधीच या निर्णयावर टीका होण्यास सुरूवात झाली आहे. मुख्यमंत्री कोरोना पॅकेज देणार होते, ते द्या म्हणजे लोकांचे हाल होणार नाहीत, असे राम कदम यांनी म्हटले आहे. तसेच मनात येईल तेव्हा फक्त हे बंद, ते बंद असे लहरि महाशयाचे वसूलीचे धंदे आधी बंद करा, अशी टीकाही त्यांनी केली आहे.

लॉकडाऊन, कोरोना लस आणि रेमडेसिविर इंजेक्शन या बाबत सध्या सत्ताधारी आणि विरोधक यांच्यात चांगलेच आरोप-प्रत्यारोप होत आहेत. मात्र, राज्यात लॉकडाऊन लागणार असेल तर हातावर पोट असलेल्या अनेकांना आधी राज्य सरकारच्या आर्थीक पॅकेजची आवश्यकता आहे. त्या बाबत निर्णय घेतल्यानंतरच लॉकडाऊनला होणारा विरोध काही प्रमाणात कमी होण्याची शक्यता आहे.

महत्त्वाच्या बातम्या : 

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!