🕒 1 min read
मुंबई : कोरोना महामारीने मागील वर्षीपासून जगभरात थैमान घातले आहे. बऱ्याच देशांमधील कोरोना हा पूर्णपणे आटोक्यात येत असला तरी भारतात मात्र अजूनही संभाव्य तिसऱ्या लाटेचा धोका हा कायम आहे. कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत महाराष्ट्रासह देशभरात हाहाकार माजवला होता. यामुळे आता निर्बंधांमध्ये सूट देताना राज्य सरकार व प्रशासन हे गंभीरतेने विचार करूनच निर्णय घेत आहेत.
यंदा देखील कोरोनाचे सावट कायम असल्याने सर्व धर्मियांनी सण-उत्सव साधेपणाने साजरे करावे असे आवाहन केले जात आहे. राज्य सरकार आणि दहीहंडी समन्वय समितीमध्ये झालेल्या बैठकीनंतर दहीहंडीला परवानगी नाकारण्यात आली आहे. उद्याच दहीहंडी असून मनसे आणि भाजपच्या नेत्यांनी कोणत्याही परिस्थितीमध्ये दहीहंडी होणारच असा निर्धार केला आहे.
दहीहंडीचे आयोजन करण्यावर मनसे ठाम असून ठाण्यात तशी तयारी देखील सुरु झाली आहे. दरम्यान, मनसे नेते अविनाश जाधव यांना पोलिसांनी अटक देखील केली होती. आता मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांची याबाबतची भूमिका स्पष्ट झाली आहे. मनसेच्या अमेय खोपकर यांनी याबाबत ट्विट केलं आहे.
आदेश राजसाहेबांचा…
हिंदू सण साजरे होणारच…यंदाची दहीहंडी दणक्यात
उत्सव संस्कृतीचा, सोहळा परंपरेचा.
चलो ठाणे????????— Ameya Khopkar (@MNSAmeyaKhopkar) August 30, 2021
‘आदेश राजसाहेबांचा…हिंदू सण साजरे होणारच…यंदाची दहीहंडी दणक्यात! उत्सव संस्कृतीचा, सोहळा परंपरेचा. चलो ठाणे’, असा नारा अमेय खोपकर यांनी दिला आहे. त्यामुळे उद्या दहीहंडी साजरी करण्यावर मनसे ठाम असून आता पोलीस आणि कार्यकर्त्यांमध्ये संघर्ष होण्याची शक्यता आहे.
महत्त्वाच्या बातम्या
- अनिल परब उद्या चौकशीला हजर राहणार ? परब-संजय राऊत भेटीनंतर राऊतांनी केलं ‘हे’ भाष्य
- ‘ठाकरे सरकारचे नियम आमदार-खासदारांच्या मुलांना लागू होत नाही का?’ निलेश राणेंचा सवाल
- अनिल परब उद्या चौकशीला हजर राहणार ? परब-संजय राऊत भेटीनंतर राऊतांनी केलं ‘हे’ भाष्य
- ‘हिंदू सणांसाठी शेवटपर्यंत लढणार…’; दहीहंडीचे आयोजन करणाऱ्या मनसेच्या अविनाश जाधवांना अटक
- ‘या’ भाजप आमदाराने ५०० कोटींचा घोटाळा केला; ईडीच्या कारवाईनंतर खा.भावना गवळींचा आरोप
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
