🕒 1 min read
Raj Thackeray | रत्नागिरी : एकीकडे राज्यपाल भगतसिंग कोश्यारी आपल्या वादग्रस्त विधानांमुळे चर्चेत आहेत. त्यांच्यावर कारवाई होण्याची शक्यता आहे. अशातच, भाजपच्या आणखी एका नेत्याने छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जन्मासदंर्भात वादग्रस्त वक्तव्य केलं आहे. यावरून राजकीय वातावरण तापलेलं आहे.
छत्रपती शिवाजी महाराजांचा जन्म कोकणात झाला असल्याचं वक्तव्य प्रसाद लाड (Prasad Lad) यांनी केलं आहे. प्रसाद लाड यांच्या या विधानानंतर मनसे अध्यक्ष राज ठाकरे (Raj Thackeray) यांनी प्रतिक्रिया दिली आहे. राज ठाकरे सध्या कोकण दौऱ्यावर आहेत. आज रत्नागिरीत असताना त्यांनी माध्यमांना प्रतिक्रिया दिलीय.
“शिवाजी महाराजांकडून काही घेऊ नका. जे महाराजांनी सांगितलं, जे महाराजांनी शिकवलं, त्या गोष्टी शिकायचं नाही. फक्त नको ते वाद करत बसायचे. एवढच सध्या सुरू आहे”, अशी प्रतिक्रिया त्यांनी दिली. त्याचबरोबर बेरोजगारी, शिक्षण आदी महत्त्वाच्या मुद्द्यांवर लक्ष विचलीत करण्यासाठी नको ते विषय काढले जातात, असेही ते म्हणाले.
प्रसाद लाड यांच्या या विधानानंतर राष्ट्रवादीचे आमदार अमोल मिटकरी (Amol Mitkari) यांनी भाजपावर टीका केली आहे. “सकाळ झाली भाजपाचे लोक एक बेताल व्यक्तव्य करत आहेत. प्रसाद लाड यांनी नवा जावई शोध लावला आहे. शिवरायांचा जन्म शिवनेरी किल्यावर झाला. शिवरायांची राजधानी रायगड होती, असे आम्ही वाचत आलो आहोत. मात्र लाड म्हणत आहेत की शिवरायांचा जन्म कोकणात झाला. विशेष म्हणजे ते स्क्रीप्ट वाचून असे सांगत आहेत”, असा आरोप करत अमोल मिटकरी यांनी भाजपला टोला लगावला आहे.
महत्वाच्या बातम्या :
- Udayanraje Bhosale | “मुजरा महाराज…सर्वसामान्य मावळा म्हणून बोलतोय…”; उदयनराजेंचं छत्रपती शिवाजी महाराजांना भावनिक पत्र
- Amol Mitkari | “भाजपाने नाक रगडून…”; प्रसाद लाड यांच्या वक्तव्यावर अमोल मिटकरी संतापले
- Prasad Lad | “शिवरायांचा जन्म कोकणात झाला”; भाजपच्या आणखी एका नेत्याचं वादग्रस्त वक्तव्य
- Sanjay Raut | “…तर सरकारला अमित शाहादेखील वाचवू शकणार नाहीत”; संजय राऊत असं का म्हणाले?
- Sanjay Raut | “संजय राऊतांनी शिवसेनेचं वाटोळ केलं…”, एकनाथ शिंदे गटाचा घणाघात
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
