🕒 1 min read
पंजाब नॅशनल बँकेमध्ये झालेल्या ११ हजार कोटींच्या घोटाळयामुळे संपूर्ण देश हादरून गेला आहे. या घोटाळ्याचा आरोप असणारा नीरव मोदी हा प्रसिद्ध हिरे व्यापारी आहे. घोटाळा उघडकीस आल्यानंतर नीरव मोदीने देखील विजय मल्ल्याप्रमाणे देशातून पलायन केले आहे. यानंतर आता नीरव मोदी हा पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या दावोसमधील व्यापाऱ्यांच्या शिष्टमंडळात सहभागी असल्याच उघड झाले आहे. यावरूनच कॉंग्रेस अध्यक्ष राहुल गांधी आणि दिल्लीचे मुख्यमंत्री अरीवंद केजरीवाल यांनी ट्विटरवरून सरकारवर निशाना साधला आहे.
निरव मोदींनी पहिल्यांदा पंतप्रधानांना मिठी मारली आणि नंतर त्यांच्यासोबत दावोसला दिसले. आणि पुढे पंजाब बँकेत ११ हजार ३०० कोटींचा घोटाळा करुन मल्ल्यासारखाच पळून गेला आणि सरकार फक्त बघत बसल्याची टीका राहुल गांधी यांनी केली आहे.
Guide to Looting India
by Nirav MODI1. Hug PM Modi
2. Be seen with him in DAVOSUse that clout to:
A. Steal 12,000Cr
B. Slip out of the country like Mallya, while the Govt looks the other way.— Rahul Gandhi (@RahulGandhi) February 15, 2018
तर दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी ट्विटकरत ‘सरकारच्या मदतीशिवाय विजय मल्ल्या किंवा नीरव मोदी देश सोडून जाणे शक्य आहे का?’ असा प्रश्न विचारला आहे.
Is it possible to believe that he or vijay mallya left the country without active connivance of BJP govt? https://t.co/6iMFf9VAkF
— Arvind Kejriwal (@ArvindKejriwal) February 15, 2018
तर माकपचे नेते सीताराम येचुरी यांनी दावोसमधील पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या समवेत असणारा नीरव मोदीचा फोटो पोस्ट करत टीका केली आहे.
If this person had fled India before the FIR on Jan 31, then he is here, photographed at Davos with PM, a week before the FIR, after having escaped from India? Modi govt must clarify. #NiravModi #PublicMoneyLoot pic.twitter.com/gQQnKQNjDo
— Sitaram Yechury (@SitaramYechury) February 15, 2018
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
