मुंबई : चीनबरोबर वाढत्या तणावाच्या मुद्द्यावरुन काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींवर घणाघाती टीका केली होती. मोदी बीजिंगला ‘शरण’ गेल्याचा आरोप राहुल गांधी यांनी केला होता. नरेंद्र मोदी हे खरं तर ‘सरेंडर’ मोदी आहेत, अशा शब्दात राहुल गांधी यांनी टीका केली होती. ‘जपान टाईम्स’मधील एका लेखाची लिंक शेअर करत राहुल गांधी यांनी नरेंद्र मोदींवर निशाणा साधला होता.
राहुल गांधींच्या याच वक्तव्याचा समाचार आता केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांनी घेतला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी हे सरेंडर मोदी नसून धुरंधर मोदी आहेत. साऱ्या देशात नरेंद्र मोदींची हवा त्यामुळे राहुल गांधी अत्यंत परेशान आहेत”, असं केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले म्हणाले आहेत. नुकतंच भारत-चीन तणावावरुन काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी पंतप्रधान मोदींवर टीकास्त्र सोडलं होतं. त्याला आठवलेंनी उत्तर दिलं आहे.
सर्व पक्षांनी पंतप्रधान मोदींच्या मागे उभं राहायला हवे. राहुल गांधींच्या वक्तव्याचा निषेध करतो. निवडणूक आल्यावर सरकारने अथवा मोदींनी आपले जवान शहीद केले असे म्हणणे चुकीचे आहे. आपला भारत आता 1962 चा भारत राहिला नाही हे चीनने लक्षात घ्यावे. अस देखीलं रामदास आठवले म्हणाले आहे.
शरद पवार हे ‘जाणता राजा’च, संजय राऊतांनी मिसळला आव्हाडांच्या सुरात सूर
वाकडी येथील घटनेमुळे महाराष्ट्राची बदनामी – रामदास आठवले
प्रिय पंतप्रधान, स्वित्झर्लंडमधील काळा पैसा परत आणला का ? ; राहुल गांधी
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

