🕒 1 min read
मुंबई : राज्यात सध्या मराठा आरक्षणाचा मुद्दा चांगलाच पेटला आहे तर दुसरीकडे आता ओबीसी नेते देखील आक्रमक होऊ लागले आहेत. मराठा समाजाला ओबीसीमधून आरक्षण देण्याचा प्रयत्न झाल्यास राज्यातील ओबीसी आणि भटके विमुक्त समाज पेटून उठेल. या समाजाचा आक्रोश मग सरकारला पाहायला मिळेल, असा गर्भित इशारा ओबीसी नेते प्रकाश शेंडगे यांनी ठाकरे सरकारला दिला.
मराठा समाजाला ओबीसी प्रवर्गातून आरक्षण देण्याचा कोणताही प्रस्ताव महाराष्ट्र सरकारने पारित करु नये. जर सरकारने तसा प्रस्ताव पारित करण्याचा प्रयत्न केला किंवा त्यासंबंधी काही पावले उचलली तर ओबीसी आणि भटक्या विमुक्तांचा आक्रोश होईल, असा इशारा शेंडगे यांनी राज्य सरकारला दिला.
ओबीसी आरक्षणाच्या मुद्यावर OBC आणि VJNT संघर्ष समितीकडून आज मुंबईत पत्रकार परिषद आयोजित करण्यात आली होती. या पत्रकार परिषदेत प्रकाश अण्णा शेंडगे यांनी ओबीसी आरक्षणाच्या मुद्यावर राज्य सरकारला गंभीर इशारा दिला आहे.
‘मराठा समाजाच्या नेत्यांनी सरकारकडे काही ही मागणी केली तर सरकार लगेच त्यांना प्रतिसाद देते. राज्य सरकार जर मराठा समाजाला आमच्यापेक्षा वेगळं 13 टक्के आरक्षण देणार असेल तर त्याला आमची हरकत नाही. पण जर ओबीसी आरक्षणाला हात लावला तर एकाही मंत्र्याला राज्यात फिरू देणार नाही, असा इशाराच शेंडगे यांनी दिला.
महत्वाच्या बातम्या
- …म्हणून राज्यपालांकडे जाणं हा महाराष्ट्राचा अपमान; संजय राऊतांची राज ठाकरेंवर टीका
- ‘मी पवारांना भेटून राज्यपालांना मार्गदर्शन करायला सांगणार आहे’
- नाशिकमधील बारा बाजार समित्यांमध्ये कांद्याचे लिलाव झाले सुरु
- ‘माझ्या सहकाऱ्यांनो,सीमाभागातील मराठी बांधवांचा आवाज बुलंद करू,दडपशाहीचा धिक्कार करू’
- आरोग्य सेतू ॲप कुणी बनवलं ? इलेक्ट्रॉनिक आणि माहिती तंत्रज्ञान मंत्रालयाने केला खुलासा
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
