उमरगा : कवी डॉ. बालाजी इंगळे यांच्या कोरोना काळावरील ‘या परावलंबी दिवसात’ या काव्यसंग्रहास उत्कृष्ट काव्यसंग्रह पुरस्कार प्रदान करण्यात आला आहे. नाशिक येथे झालेल्या राज्यस्तरीय साहित्य संमेलनात मान्यवरांच्या हस्ते बालाजी इंगळे यांना हा पुरस्कार प्रदान करण्यात आला.
कवी डॉ. बालाजी मदन इंगळे यांनी कोरोना काळात ‘या परावलंबी दिवसात’ या काव्यसंग्रहाची निर्मिती केली होती. यासाठी त्यांना ९४ व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन कार्यवाह डॉ. शंकर बोऱ्हाडे आणि साहित्यकणा साहित्य संमेलनाचे अध्यक्ष डॉ. राहुल पाटील यांच्या हस्ते पुरस्कार देवून सन्मान करण्यात आला.
रोख रक्कम, स्मृतीचिन्ह, सन्मानपत्र व शाल असे या पुरस्काराचे स्वरूप आहे. यावेळी साहित्यकणा फाऊंडेशनचे अध्यक्ष संजय गोराडे, सचिव विलास पंचभाई, प्रा. राज शेळके मान्यवर आदी उपस्थित होते.
महत्वाच्या बातम्या
- ‘स्वतःचे ठेवावे झाकून आणि दुसऱ्याचे पाहावे वाकून या भूमिकेत आमच्या जुन्या मित्रांनी स्वतःला रंगवून घेतले’
- ‘तुमच्या नंगेपणास कोकणातील भुतेही घाबरत नाहीत, तेथे देवादिकांचे काय घेऊन बसलात !’
- टीम इंडिया पुढे आव्हान; विराट कोहली आणि रिषभ पंतकडून आशा…
- सचिन,लतादीदी,कोहली यासारख्या दिग्गज सेलिब्रिटींवर खरंच कुणी दबाव टाकू शकेल ?
- वनक्षेत्राला लागलेल्या आगीत 2 हेक्टरवरील झाडे जळून खाक
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
