Share

‘जनतेला धोका देऊन केलेली युती जनतेला मान्य नाही’, रावसाहेब दानवे यांचा घणाघात

Published On: 

जालना: राज्यात जे काही सुरू आहे ते जनतेला मान्य नाही. शिवसेना काँग्रेस आणि राष्ट्रवादीची युती अनैसर्गिक आहे, आमची तयारी सुरू झालेली आहे. २०२४ च्या निवडणुकीत यांना आम्ही नक्की धडा शिकवू, असा घणाघात केंद्रीय मंत्री व भाजपचे नेते रावसाहेब दानवे यांनी महाविकास आघाडीवर केला. ते एका वृत्तवाहिनीशी बोलत होते.

राज्यात आरक्षण प्रश्न ज्वलंत झाला आहे. मराठा,ओबसी आरक्षणावरून राज्यभर आंदोलन करण्यात येत आहेत. या वरून भाजपाने महाविकास आघाडी सरकारला चांगलेच कोंडीत पकडण्याचा प्रयत्न करत आहे. त्यात कोरोनाचे महासंकट तर आहेच त्याची व्यवस्था करण्यात राज्यसरकारने लक्ष घालावे की विरोधकांच्या विरोधाला तोंड द्यावे, अशी परिस्थिती महाविकास आघाडीची झाली असल्याचे चित्र सध्या दिसत आहे.

महाविकास आघाडी सरकारची ही युती जनतेला धोका देवून करण्यात आली आहे. शिवसेना आणि भाजप ही जनतेच्या मनातली युती होती. उद्धव ठाकरेंनी ती युती तोडली असून जनता याचा बदला २०२४ च्या निवडणुकीत घेतल्या शिवाय राहणार नाही, असा घणाघात रावसाहेब दानवे यांन केला आहे तसेच या साठी आमची तयारी देखील सुरु असल्याचे देखील त्यांनी सांगितले.

महत्वाच्या बातम्या 

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!