Share

केवळ पंचनामे न करता शेतकऱ्यांना तातडीने पैसे द्या- स्नेहलता कोल्हे

Published On: 

अहमदनगर/ऋषिकेश घोगरे:- कोपरगाव तालुक्याच्या पूर्व भागाला वादळी वाऱ्यासह मुसळधार पावसाने झोडपले. त्यात उभी पिके जमीनदोस्त झाली. अशा परिस्थितीत केवळ पंचनामे करून कागदी घोडे नाचविण्यापेक्षा, शेतकऱ्यांना तातडीने पैसे द्या, अशी मागणी भाजपच्या प्रदेश सचिव, माजी आमदार स्नेहलता कोल्हे यांनी कृषिमंत्री दादा भुसे यांच्याकडे केली आहे.

कोल्हे म्हणाले की, शेतकऱ्यांना लॉकडाउनमध्ये शेतीमाल कवडीमोल भावात विकावा लागला. या संकटावर मात करीत उभी केलेली पिके अतिवृष्टी आणि वादळी वाऱ्याने जमीनदोस्त झाली. त्यामुळे शेतकऱ्यांच्या संकटात आणखी भर पडली आहे. आता नेहमीप्रमाणे केवळ पंचनामे करून कागदपत्रे रंगविण्यापेक्षा शेतकऱ्यांना तातडीने आर्थिक मदत करणे गरजेचे आहे, असे कोल्हे म्हणाल्या.

तालुक्यातील खोपडी, लौकी, देहगाव बोलका, पढेगाव, करंजी, खिर्डी गणेश, धोत्रे, आपेगाव, कासली, शिरसगाव, गोधेगाव, भोजडे आदी गावांना अतिवृष्टी आणि वादळाचा तडाखा बसला. पिकांचे मोठे नुकसान झाले. झालेल्या नुकसानीची कोल्हे यांनी पाहणी केली. यावेळी माजी तालुकाध्यक्ष शरदराव थोरात, तालुकाध्यक्ष साहेबराव रोहोम उपस्थित होते.

महत्वाच्या बातम्या:-

वन विकासासाठी ‘बाहुबली’चा पुढाकार, केली इतक्या कोटींची मदत

विधानपरिषदेच्या उपसभापती पदी शिवसेनेच्या निलम गोर्हे यांची बिनविरोध निवड

अर्णव गोस्वामी सुपारीबाज पत्रकार, सभागृहात शिवसेना आक्रमक…

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
Maharashtra Desha App Faster news updates आणि notifications साठी App इन्स्टॉल करा.
Install
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!