Share

‘विरोधी पक्ष आपले दुश्मन नसतात’, मुख्यमंत्र्यांच्या ‘त्या’ वक्तव्यावर भुजबळांची प्रतिक्रिया

Published On: 

औरंगाबाद : मराठवाडा मुक्तीसंग्राम दिनाच्या निमित्ताने आज(१७ सप्टें.) औरंगाबादमध्ये वेगवेगळ्या कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले. यावेळी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे देखील सर्व कार्यक्रमांसाठी उपस्थित आहेत. दरम्यान औरंगाबादमधील जिल्हा परिषदेच्या इमारतीच्या उद्घाटनवेली ठाकरे यांनी केलेल्या एका वक्तव्यामुळे राजकीय क्षेत्रात चर्चांना उधाण आले आहे.

यावेळी बोलत असतांना मुख्यमंत्र्यांनी ‘व्यासपीठावर उपस्थित असलेले माझे आजी-माझी आणि एकत्र आले तर भावी सहकारी’, असे वक्तव्य केले आहे. ठाकरेंच्या या वक्तव्यामुळे वेगवेगळे तर्क काढले जात आहेत. याच पार्श्वभूमीवर राज्याचे अन्न,नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण मंत्री छगन भुजबळ यांनी देखील ठाकरेंच्या या विधानावर सुचक वक्तव्य केले आहे. भुजबळ म्हणाले की, राजकीय क्षेत्रात वैचारिक मतभिन्नता असू शकते. मात्र,राजकारणात सर्व एकमेकांशी मैत्री जपतात. त्यात चुकीचे काय?. विरोधी पक्ष हे आपले दुश्मन नसतात ते फक्त आपले राजकारणातच विरोधक आहेत. तसेच महाविकास आघाडीपासून कोणाला धोका असू शकतो पण महाविकास आघाडीला कसलाही धोका नाही.’ असेही ते म्हणाले.

दरम्यान, या कार्यक्रमाला केंद्रीय रेल्वेमंत्री रावसाहेब दानवे, भागवत कराड, कॉंग्रेसचे बाळासाहेब थोरात तसेच अब्दुल सत्तर यांची उपस्थिती होती. त्यामुळे आता मुख्यमंत्र्यांनी केलेल्या वक्तव्याचा नेमका जोर कुणाकडे होता. यावरून वेगवेगळे तर्क लावले जात आहेत.

महत्त्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!