Share

बाजारात नव्या कांद्याची आवक होऊनही वाढीव दरात उतार नाही

Published On: 

टीम महाराष्ट्र देशा– शेतकऱ्यांसाठी अनपेक्षित धनाची पेटी ठरलेला कांदा आता सामान्य ग्राहकांच्या डोळ्यांतून अश्रू आणत आहे. आधी हॉटेलांतून, नंतर भज्यांमधून आणि आता भाजीमधूनही कांदा हद्दपार होतो की काय अशी स्थिती निर्माण झाली आहे.

नाशिक जिल्ह्यात उन्हाळी कांद्याला काल वणी इथल्या उपबाजारात १२ हजार रूपयेप्रती क्विंटल इतका विक्रमी भाव मिळाला. कळवण इथं कांद्याला ११ हजार रुपये भाव मिळाला. लासलगाव बाजारसमिती आवारात मात्र उन्हाळी कांद्याची आवक घटली आहे. या ठिकाणी लाल कांद्याला ८ हजार १५२ रूपये प्रतिक्विंटल इतका भाव मिळाला.

अहमदनगर आणि सोलापूरच्या बाजारपेठेतही कांद्याला काल प्रती किलो शंभर ते सव्वाशे रुपये इतका भाव मिळाला. दरम्यान देशभरात कांद्याच्या वाढत्या किमतींचा आढावा घेण्यासाठी मंत्रिमंडळ सचिव राजीव गौबा यांच्या अध्यक्षतेखाली काल कांदा उत्पादक राज्यांच्या मुख्य सचिवांची बैठक झाली.

जुना कांदा संपला असून नव्या काद्यांचीही आवक बाजार समितीत निम्म्याने घटली आहे. भाव मिळत असल्याचे पाहून शेतकरी ओला कांदाही बाजारात आणत आहेत. काही शेतकरी पूर्ण वाढ होण्यापूर्वीच कांदा काढून आणत असून कांद्याची पातही आणली जात आहे. कांद्याच्या पातीची जुडी २० ते २५ रुपयांना विकली जात आहे.

महत्वाच्या बातम्या : 

https://twitter.com/Maha_Desha/status/1201807341303169024?s=20

https://twitter.com/Maha_Desha/status/1201809582001012736?s=20

https://twitter.com/Maha_Desha/status/1201812924886466560?s=20

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!