🕒 1 min read
टीम महाराष्ट्र देशा- कर्जमाफीची रक्कम पात्र शेतकऱ्यांच्या खात्यात जमा करण्यासाठी, राज्यातील सर्व जिल्हा सहकारी बँका, बँक ऑफ महाराष्ट्र आणि स्टेट बँक ऑफ इंडियाच्या सर्व शाखा आज सुरू राहणार आहेत.त्यामुळे शेतकरी कर्जमाफीची रक्कम शेतकऱ्यांच्या खात्यात जमा करण्याच्या कामाला वेग आल्याचं पाहायला मिळत आहे.शेतकरी आंदोलनानंतर सरकारनं कर्जमाफी तर केली. पण शेतकऱ्यांच्या खात्यात कधी पैसे येणार, यावर उलटसुलट चर्चा सुरू होत्या. आज खात्यात पैसे पडल्यानंतर शेतकऱ्यांना दिलासा मिळेल.कर्जमाफीची रक्कम पात्र शेतकऱ्यांच्या खात्यात जमा करण्यासाठी, राज्यातील सर्व जिल्हा सहकारी बँका, बँक ऑफ महाराष्ट्र आणि स्टेट बँक ऑफ इंडियाच्या सर्व शाखा आज सुरु राहणार आहेत.


