Share

‘अब व्हॅक्सिन १० जनपथ होकर नहीं जाता..डायरेक्ट जाता है!’, गिरीराज सिंह यांचे प्रत्युत्तर

Published On: 

नवी दिल्ली : देशातील लसीकरणाच्या गतीवरुन काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी केंद्र सरकारवर टीका केलीय. आधीपासून राहुल गांधी लसीकरणावरुन मोदी सरकारवर टीका करत आहेत. त्यात २१ जूनपासून लसीकरणाची गती वाढणे अपेक्षीत होते. मात्र, अद्याप ती गती वाढलेली नसल्याचा आरोप राहुल यांनी या माध्यमातून केला आहे. राहुल यांच्या आरोपला केंद्रीय मंत्री गिरीराज सिंह यांनी प्रत्युत्तर दिले आहे.

या संदर्भात राहुल गांधी यांनी सोशल मीडियाच्या माध्यमातून मोदी सरकारला प्रश्न विचारला आहे. जुलै महिना आला मात्र अद्याप लस उपलब्ध झालेली नसल्याचा आरोप राहुल यांनी केला आहे. यावर गिरीराज सिंह यांनी प्रत्युत्तर दिले आहे. आता व्हॅक्सिन ‘१० जनपथ’ म्हणजे राहुल गांधींच्या घरुन नाही तर सरळ लोकांपर्यंत जात असल्याचे सिंह यांनी म्हटले आहे.

कोरोना रुग्ण संख्या कमी झाली असली तरी अद्याप धोका कमी झालेला नाही. देशात पुन्हा तिसरी लाट येण्याची भीती व्यक्त करण्यात येत आहे. तसे झाल्यास पुन्हा लॉकडाऊन लावण्याची परिस्थिती निर्माण होवू शकते. त्यामुळे तिसरी लाट रोखायची असल्यास लसीकरणात वाढ हा एकमेव पर्याय आहे. यावरुन काँग्रेस आणि भाजप यांच्यात आरोप-प्रत्यारोप सुरूच आहेत.

महत्त्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!