🕒 1 min read
टीम महाराष्ट्र देशा : भाजप अध्यक्ष आणि देशाछे गृहमंत्री अमित शहा रविवारी मुंबई दौऱ्यावर होते. यावेळी अमी शहा यांच्या भाषणाने भाजपच्या प्रचाराचा नारळ फुटला. किती ही काही झाली तरी देवेंद्र फडणवीसचं राज्याचे नवे मुख्यमंत्री असणार,असा शहा यांनी विश्वास व्यक्त केला. शहांच्या या वक्तव्यामुळे शिवसेनेला चांगलाचं दणका बसला असल्याच बोललं जात आहे. त्यामुळे शिवसेनेने आपल्या ‘सामना’ या मुखपत्रातून याला उत्तर दिले आहे.
देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखालील सरकारने राज्यातील सर्व प्रश्न मार्गी लावले आहेत. महाराष्ट्रात आता कोणतेच प्रश्न शिल्लक नाहीत. असा आत्मविश्वास याआधी कोणत्याही पक्षाने दाखवला नव्हता. ते खरेच सुटले असतील तर युतीला 250 पेक्षा जास्त जागा महाराष्ट्रात मिळतील. तसेच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस पुढचे मुख्यमंत्री असतील. त्यामुळे निवडणूक ही केवळ औपचारिकता बाकी आहे, असे सामानाच्या अग्रलेखात लिहिण्यात आले आहे.
दरम्यान जम्मू-काश्मीरमधील कलम 370 रद्द करण्याच्या ऐतिहासिक निर्णयावर भाष्य करण्यासाठी भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शहा काल मुंबई दौऱ्यावर आले होते. गोरेगाव येथील नेस्को संकुलात अमित शहा यांनी उपस्थितांना संबोधित केले. यावेळी अमित शहा यांनी येत्या काळात देवेंद्र फडणवीसचं पुन्हा मुख्यमंत्री असणार, असा विश्वास व्यक्त केला. अमित शहा यांचे भाषण जरी काश्मीर बाबत असले तरी निवडणुका लागल्यानंतर भाजपचा आज खऱ्या अर्थाने प्रचाराचा नारळ फुटला आहे.
महत्वाच्या बातम्या
https://twitter.com/Maha_Desha/status/1176047243247226885?s=20
https://twitter.com/Maha_Desha/status/1176044458049073157?s=20
https://twitter.com/Maha_Desha/status/1176034948911775744?s=20
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
