Share

राज्यावर अवकाळीचे संकट, ‘या’ ठिकाणी जोरदार पावसाची शक्यता !

Published On: 

पुणे : कोरोनाच्या दुसऱ्या लाटेने महाराष्ट्रात थैमान घातले आहे. राज्यातील नागरिक या संकटाशी दोन हात करत असताना आता राज्यावर आणखी संकट घोंगावत आहे. एकीकडे कोरोना विषाणूशी झगडत असताना अस्मानी संकटाने राज्यावर दुहेरी आघात केला आहे. त्यामुळे शेतकऱ्यांचा हातातोंडाला आलेला घास हिरावून गेला आहे. आजही राज्यात पावसाची स्थिती कायम असून पुण्यासह मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यात जोरदार पावसाची शक्यता हवामान खात्याकडून वर्तवण्यात आली आहे.

काल राज्यभरात विविध ठिकाणी पाऊस झाला आहे. वादळी वाऱ्यासह विजांच्या कडकडाटासह पडलेल्या पावसानं शेतकऱ्याचं मोठ्या प्रमाणात नुकसान केलं आहे. तसेच राज्यात अनेक ठिकाणी विजा पडल्यानं विविध ठिकाणी किमान 11 लोकांचा मृत्यू झाल्याची बातमी समोर आली आहे. तर एकट्या मराठवाड्यात एकूण पाच शेतकऱ्यांचा मृत्यू झाला आहे. तर दुसरीकडे पुण्याजवळील भोर याठिकाणी वीज पडून दोन चिमूरड्या मुलींचा जीव गेला आहे. त्यामुळे या अस्मानी संकटात काळजी घेण्याचा सल्ला हवामान खात्याकडून देण्यात आला आहे.

आज जळगाव, धुळे, पुणे, अहमदनगर, नाशिक नंदुरबार, सातारा, औरंगाबाद, जालना, बीड आणि उस्मानाबाद या जिल्ह्यांत अवकाळी पाऊस पडण्याचा अंदाज मुंबई वेधशाळेनं वर्तवला आहे. याठिकाणी तुफान वादळासह विजांच्या कडकडाटासह जोरदार पावसाची शक्यता आहे. त्याचबरोबर या जिल्ह्यांत तुरळक ठिकाणी गारपीट होण्याची शक्यता आहे.

महत्वाच्या बातम्या 

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!