Share

रस्त्यांच्या सेफ्टी ऑडिटसंदर्भात नितीन गडकरींनी व्यक्त केली चिंता !

Published On: 

नवी दिल्ली : देशातील अपघातांच प्रमाण वाढण्याच्या कारणांमध्ये मुख्य कारण असते ते म्हणजे रस्त्यांची अवस्था या पार्श्वभूमीवर रस्ते अपघातांचं प्रमाण कमी करण्यासाठी देशातील ४० हजार किमी राष्ट्रीय महामार्गांचा सेफ्टी ऑडिटमध्ये समावेश करण्यात आला आहे,

आंतरराष्ट्रीय रोड फेडरेशनच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या वेबिनार पार पडला यावेळी केंद्रीय परिवहन मंत्री नितीन गडकरी यांनी ही माहिती दिली. यावेळी ‘देशातील रस्ते अपघातांबद्दल चिंता व्यक्त केली आहे. देशातील रस्ते अपघातात होणाऱ्या मृत्यूच्या संख्येचा हवाला देत गडकरी यांनी ही गोष्ट करोना महामारीपेक्षाही गंभीर आणि चिंताजनक असल्याचं म्हटलं आहे.’

‘रस्ते अपघातात मरण पावणाऱ्यांपैकी १८ ते ४५ या वयोगटातील काम करणाऱ्या व्यक्तीचं प्रमाणे ७० टक्के आहे. देशात दिवसाला ४१५ लोकांचा रस्ते अपघातात मृत्यू होतो. ही परिस्थिती करोना महामारीपेक्षाही जास्त गंभीर आणि पुढील काळात ही परिस्थिती आणखी चिंताजनक होऊ शकते,’ असं गडकरी म्हणाले.

दरम्यान, ‘आता देशातील ४० हजार किमी राष्ट्रीय महामार्गांचा सेफ्टी ऑडिटमध्ये समावेश करण्यात आला आहे. या महामार्गांचं ऑडिट करून त्यातील चुका आणि उणीव शोधून काढण्यात येतील. दुरूस्त करण्यात येईल. हे दुर्दैव आहे की, रस्ते अपघातांमध्ये भारत जगात पहिल्या क्रमांकावर आहे. भारतानंतर अमेरिका आणि चीनचा क्रमाक लागतो. परिवहन मंत्री म्हणून या गोष्टीबद्दल मी खूप संवेदनशील आणि गंभीर आहे,’ असं नितीन गडकरी म्हणाले.त्याचबरोबर डीपीआर सक्षम प्राधिकरणाकडून तपासले जायला हवेत आणि त्यात बदल केले जायला पाहिजे, तटस्थ एजन्सी आणि शैक्षणिक संस्थांकडून हे बघितले गेलं पाहिजे,” असं गडकरी म्हणाले.

महत्वाच्या बातम्या 

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!