🕒 1 min read
मुंबई : मराठा समाजाला आरक्षण देण्याचा राज्य सरकारचा निर्णय सर्वोच्च न्यायालयानं रद्द केला आहे. आरक्षणाची ५० टक्क्यांची मर्यादा ओलांडली जात असल्यामुळं सर्वोच्च न्यायालयानं मराठा आरक्षण रद्द ठरवण्यात आलं आहे. यामुळे मराठा समाजातून तीव्र संताप व्यक्त केला जात आहे.
मराठा समाजातील नेत्यांसह भाजप नेत्यांनी महाविकास आघाडी सरकारला लक्ष्य केलं आहे. भाजप नेते निलेश राणे यांनी मराठा आरक्षण उपसमितीचे अध्यक्ष अशोक चव्हाण यांच्यावर अत्यंत बोचऱ्या शब्दात टीका केली आहे. तर, बंगालच्या निवडणुकांमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांचा अदृश्य हात असल्याने ममता बॅनर्जी यांचा विजय झाल्याचं बोललं जात आहे. मात्र, मराठा समाजाला आरक्षण मिळावं यासाठी कधी पवार साहेबांचे अदृश्य हात जाणवले नाहीत उलट मराठा आरक्षण विरोधी त्यांनी भूमिका घेतली, असा आरोप राणेंनी केला आहे.
मराठा समाजाला आरक्षण मिळावं त्याकरिता कधी पवार साहेबांचे अदृश्य हात जाणवले नाहीत पण मराठ्यांना आरक्षण मिळूच नाही याकरिता अनेक वेळा त्यांची भूमिका जाणवली. ठाकरे सरकारने मराठा आरक्षणाचे सगळ्या बाजूने तीन तेरा वाजवले. अशोक चव्हाण साधे केळी विकायच्या लायकीचे नाहीत.
— Nilesh N Rane (@meNeeleshNRane) May 5, 2021
‘मराठा समाजाला आरक्षण मिळावं त्याकरिता कधी पवार साहेबांचे अदृश्य हात जाणवले नाहीत पण मराठ्यांना आरक्षण मिळूच नाही याकरिता अनेक वेळा त्यांची भूमिका जाणवली. ठाकरे सरकारने मराठा आरक्षणाचे सगळ्या बाजूने तीन तेरा वाजवले. अशोक चव्हाण साधे केळी विकायच्या लायकीचे नाहीत,’ असा घणाघात निलेश राणे यांनी ट्विटरद्वारे केला आहे.
महत्त्वाच्या बातम्या
- ‘भाजप, राष्ट्रवादी आणि काँग्रेस पक्षातील मराठा समाजानं गरीब मराठा समाजावर अन्याय केलाय’
- राज्य सरकारच्या निषेधार्थ पंढरपुरात मराठा समाजातील तरुणांनी केले सामुहिक मुंडन
- ‘मराठा समजासाठी काळा दिवस ;अशोक चव्हाणांनी राजीनामा द्यावा’
- रिषभने रचला इतिहास; आयसीसी कसोटी क्रमवारीत टॉप १० मध्ये समावेश होणारा भारताचा पहिला यष्टिरक्षक फलंदाज
- ‘ममता बॅनर्जी यांनी तृणमूल काँग्रेस कार्यकर्त्यांनी सुरु केलेला हिंसाचार त्वरित थांबविला पाहिजे’
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
