टीम महाराष्ट्र देशा:- विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर राज्यातील राजकारण ढवळून निघालेले आहे. अर्ज भरलेल्या उमेदवारांनी आता प्रचारालाही सुरवात केली आहे. याच पार्श्वभूमीवर शेतकऱ्यांनो भाजपाचे नेते तुमच्या दारात मतं मागायला येतील. त्यांना तुमच्या दारातही उभं करु नका असं म्हणत अहमदनगर येथील सभेत राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी भाजपाच्या नेत्यांवर टीका केली आहे.
यावेळी बोलताना पवार पुढे म्हणाले, भाजपाला शेतकरी आणि शेती यांच्याबाबत काहीही आस्था नाही त्यामुळे त्यांना दारात उभंही करु नका. शेतकऱ्यांना दोन पैसे मिळण्याची वेळ आली तेव्हा कांदा निर्यातबंदीचा निर्णय घेणारं हे सरकार आहे त्यांना मतं देऊ नका असं आवाहन शरद पवार यांनी केले.
तसेच या सरकारने शेतकरी आणि उद्योगांचे मोठे नुकसान केले. सरकारच्या धोरणामुळे अनेक कारखाने बंद पडले. लोकांचे रोजगार गेले असं म्हणत शरद पवारांनी केंद्र आणि राज्य सरकारवर घणाघाती टीका केली.
महत्वाच्या बातम्या
https://twitter.com/Maha_Desha/status/1181493851111993344?s=20
https://twitter.com/Maha_Desha/status/1181503753347719169?s=20
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

