टीम महाराष्ट्र देशा : जम्मू काश्मीरमधील तणावपूर्ण स्थिती पाहता कलम १४४ लागू करण्यात आले आहे. तसेच स्थानिक पक्षांच्या प्रमुखांना नजरकैदेत ठेवण्यात आले आहे. हे कलम १५ ऑगस्ट म्हणजे स्वातंत्र्यदिनाच्या मध्यरात्रीपर्यंत लागू राहणार आहे. त्यामुळे तोपर्यंत या परिसरात लष्कराचे वर्चस्व राहणार आहे.
याविषयी गृहमंत्री अमित शाह यांनी राज्यसभेत निवेदन सदर केले. या निवेदनात त्यांनी कलम ३७० मधील तरतुदी रद्द करण्यात येतील अस निवेदन केले. त्यामुळे विरोधकांनी सभागृहात प्रचंड गदारोळ घातला. तसेच नवीन विधेयक संमत कराव अस विधान केले. राष्ट्रपतींच्या स्वाक्षरीनंतर हे कलम हटवणार आहेत.
दरम्यान, या तरतुदी हटवल्यामुळे जम्मू काश्मीरला मिळणार विशेषाधिकार कमी झाले आहेत. त्यामुळे आता सर्वसामान्य भारतीय जनता आता जम्मू काश्मीरमध्ये वास्तव्य करू शकते.
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

