🕒 1 min read
नवी दिल्ली : भारत आणि श्रीलंकायांच्यात ४ मार्च पासून पहिला कसोटी सामना खेळला जात आहे. त्यातील दुसऱ्या दिवसाच्या लंच ब्रेक पर्यंत भारत ७ बाद ४६८ अशा मजबूत स्थितीत आहे.
श्रीलंकन गोलंदाजाना पहिल्या सत्रात फक्त १ विकेट्स घेण्यात यश मिळाले. सध्या मैदानावरती तंबू ठोकून असलेल्या रवींद्र जडेजाने जबरदस्त शतक लगावले आहे. तो १०२ धावांवर नाबाद खेळत आहे. तर जयंत यादव २ धावांवर खेळत आहे.
भारतीय संघाने दिवसचा खेळ ६ बाद ३५७ पासून सुरु केला. काल नाबाद असणारे जडेजा आणि आर अश्विन यांनी आजच्या दिवसाच्या खेळची सुरुवात केली. या दोघांनी ७ व्या विकेट साठी १३० धावांची महत्वपूर्ण भागीदारी केली. अश्विन ६१ धावा करून बाद झाला. भारताने दुसऱ्या दिवसाच्या पहिल्या सत्रात २७ षटकात १११ धावा केल्या.
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
