मुंबई -पेट्रोल डिझेलचे दर वाढवून मोदी सरकार लोकांचे खिसे कापत असून हे पाकिटमार सरकार बनलेय असा थेट आरोप राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय प्रवक्ते आणि अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक यांनी केला आहे.
दिवसेंदिवस पेट्रोल डिझेलचे दर वाढतच आहेत. काही जिल्हयात पेट्रोलचा दर शंभरावर पोचला आहे. जगात पेट्रोल आणि डिझेलचे दर स्थिर असताना भारतातच दर का वाढवले जात आहेत हे मोदींनी जनतेला सांगितले पाहिजे अशी मागणीही नवाब मलिक यांनी केली आहे.
आता कोरोनाचे संकट असताना पेट्रोल आणि डिझेलचे दर वाढवणे याचे पडसाद महागाई वाढण्यावर होत आहेत त्यामुळे लोकांची लूट थांबवावी आणि जगात पेट्रोल आणि डिझेलचे दर आहेत तेच भारतात असावेत असे सांगतानाच तेलाची लूट थांबवावी अशी मागणीही नवाब मलिक यांनी केली आहे.
दरम्यान, गेले दोन दिवस इंधनाच्या किंमती स्थिर राहिल्यानंतर आज पुन्हा एकदा पेट्रोल-डिझेलच्या दरात वाढ झाली आहे. गेल्या आठवड्यात सलग चार दिवसांच्या दरवाढीनंतर पेट्रोलचा दर हा 87 पैसे आणि डिझेलच्या दरात प्रतिलीटर 1 रुपयांची वाढ झाली होती. आजही देशाच्या वेगवेगळ्या शहरांमध्ये पेट्रोलच्या दरात 18 ते 27 पैशांनी वाढ झाली आहे. तर डिझेलच्या किंमतीत 26 ते 35 पैसे प्रतिलिटरपर्यंत वाढ झाली आहे.
महत्त्वाच्या बातम्या
- घाटीत कोरोनाग्रस्त बालकांना खेळण्यासाठी खोली मात्र, पालकांनो ही वेळच यायला नको!
- …तर ही वेळच आली नसती, विदेशातून मिळणाऱ्या मदतीवर राहुल यांची टीका
- आता एकाच अर्जाद्वारे मिळणार शेतकऱ्यांना अनेक योजनांचा लाभ
- मायदेशी परतल्यानंतर बोल्टची भावुक पोस्ट, भारतात पुन्हा परतण्याची केली इच्छा व्यक्त
- नुसत्या जाहिरातीच्या माध्यमातून कोरोना संपणार नाही, नवाब मलिकांचा हल्लाबोल


