🕒 1 min read
टीम महाराष्ट्र देशा : राष्ट्रवादी कॉंग्रेसने शेतकऱ्यांच्या बी-बियाण्यांच्या प्रश्नावरून सरकारवर निशाणा साधला आहे. शेतकऱ्यावर ओढवलेल्या या परिस्थितीला सरकार आणि सरकारचे धोरणच जबाबदार आहे, अशी टीका राष्ट्रवादी कॉंग्रेसने केली आहे.
राज्यात दुष्काळी परिस्थिती निर्माण झाली आहे. दरम्यान अमरावती जिल्ह्यातील काही शेतकऱ्यांना सरकारकडून बी-बियाणे भेटले नाहीत, त्यामुळे तेथील एका शेतकऱ्याने सरकारचा निषेध म्हणून दगडांची पेरणी केली.
याचमुद्यावरून राष्ट्रवादी कॉंग्रेसने सरकारवर निशाणा साधला. ज्या विदर्भात शेतकऱ्यावर दगडांची पेरणी करण्याची वेळ आली त्याच विदर्भात महाराष्ट्राचे मुख्यमंत्री असताना शेतकऱ्यांना बी-बियाण्यांसाठी सावकारांचे उंबरठे झिजवावे लागतात. त्यामुळे शेतकऱ्यावर ओढवलेल्या या परिस्थितीला सरकार आणि सरकारचे धोरणच जबाबदार आहे, अशी टीका राष्ट्रवादीने केली.
ज्या विदर्भात शेतकऱ्यावर दगडांची पेरणी करण्याची वेळ आली त्याच विदर्भात महाराष्ट्राचे मुख्यमंत्री असताना शेतकऱ्यांना बी-बियाण्यांसाठी सावकारांचे उंबरठे झिजवावे लागतात. त्यामुळे शेतकऱ्यावर ओढवलेल्या या परिस्थितीला सरकार आणि सरकारचे धोरणच जबाबदार आहे. pic.twitter.com/njI30Qhz02
— Nationalist Congress Party – Sharadchandra Pawar (@NCPspeaks) June 29, 2019


