टीम महाराष्ट्र देशा : सरकारच्या कुपोषण थांबवण्याच्या योजनेवरून राष्ट्रवादी कॉंग्रेसने सरकारवर निशाणा साधला. सरकारने कुपोषण थांबवण्यासाठी योजना आखल्याचा दावा जरी केला तरी त्या प्रभावीपणे राबवण्याची इच्छा मात्र मुळीचं नसल्याचे दिसते, अशी टीका राष्ट्रवादी कॉंग्रेसने केली आहे.
राज्यातील लहान मुलांचे कुपोषण थांबवण्यासाठी सरकारने योजना राबवल्या आहेत. मात्र अनेक जिल्ह्यांमध्ये अनेक मुलं कुपोषणग्रस्त आहेत. दरम्यान याचमुद्यावरून राष्ट्रवादी कॉंग्रेसने सरकारवर निशाणा साधला. पालकमंत्री गिरीश महाजन यांच्या जिल्ह्यात आजही ३७४५ मुलं कुपोषणग्रस्त आहेत. त्यामुळे सरकारने कुपोषण थांबवण्यासाठी योजना आखल्याचा दावा जरी केला तरी त्या प्रभावीपणे राबवण्याची इच्छा मात्र मुळीच नाही हेच स्षष्ट होते, अशी टीका राष्ट्रवादी कॉंग्रेसने केली.
राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या NCP या ऑफिशियल ट्विटर आकाऊँट वरून ही टीका करण्यात आली आहे.


