टीम महाराष्ट्र देशा : देशात कोरोनाच्या पार्श्वभूमीवर लॉक डाऊन घोषित करण्यात आलं आहे. राज्यात आणि विशेषकरून देशाची आर्थिक राजधानी असलेल्या मुंबईमध्ये कोरोनाची स्थिती चिंताजनक आहे. रोजच्या रोज मुंबईमध्ये कोरोना बाधित रुग्णांचा आकडा वेगाने वाढतो आहे. तसेच पालघरच्या घटनेनेही देश हादरून गेला आहे.
तसेच पालघरच्या घटनेवरून राष्ट्रवादीचे नेते आणि राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख यांच्या राजीनाम्याची मागणीही विरोधकांनी केली आहे. आता माजी केंद्रीय कृषी मंत्री आणि राष्ट्रवादी कॉंग्रेसचे अध्यक्ष शरद पवार उद्या फेसबुक लाईव्ह वरून जनतेशी संवाद साधणार आहे. याची माहिती त्यांच्या अधिकृत ट्वीटरवरून देण्यात आली आहे.
कोवीड-१९ विषाणूच्या प्रादुर्भावाच्या पार्श्वभूमीवर उद्या, मंगळवार, दिनांक २१ एप्रिल २०२० रोजी सकाळी ११ वाजता फेसबुक लाईव्हद्वारे तुमच्याशी संवाद साधणार आहे.
कोवीड-१९ विषाणूच्या प्रादुर्भावाच्या पार्श्वभूमीवर उद्या, मंगळवार, दिनांक २१ एप्रिल २०२० रोजी सकाळी ११ वाजता फेसबुक लाईव्हद्वारे तुमच्याशी संवाद साधणार आहे. #LetsFightCoronaTogether #COVID19 #CoronaVirus #FacebookLive #WarAgainstVirus pic.twitter.com/abnSSsVCGG
— Sharad Pawar (@PawarSpeaks) April 20, 2020
दरम्यान राज्य सरकारने कृषी, अत्यावश्यक सेवा आणि काही ठराविक उद्योगांना लॉक डाऊन मधून सशर्त सूट दिली आहे. याबाबतीतही शरद पवार अधिक माहिती आणि सूचना करण्याची शक्यता आहे. तसेच पालघरच्या घटनेवर पवार काय बोलणार याकडेही सर्वांच लक्ष असेल.
हेही पहा –
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

