नागपूर : गेल्या वर्षी कोरोना रोगाने हाहाकार माजवला होता. देशासह संपूर्ण जगाला कोरोनाने विळखा घातला होता. या रोगावर ठोस उपचार वा लस नसल्याने लाखो नागरिकांना आपला जीव गमवावा लागला होता. कोरोनाला प्रतिबंध घालण्यासाठी मास्क, सॅनिटायझरचा वापर करणे हे महत्वाचे असल्याने सार्वजनिक ठिकाणी मास्क सक्ती करण्यात आली होती.
कोरोनाचा वाढता धोका बगता सर्वत्र मास्क घालणे बंधनकारक करण्यात आलं आहे. मास्क न घालणाऱ्या नागरिकांवर पोलिसांनी दंडात्मक कारवाई देखील करत आहे. मात्र एका नवरदेवाने वारतीत मास्क न लावल्याने त्याला दंडाचा आहेर देण्यात आला आहे.
नागपूरमधील नेहरूनगर येथील लग्न समारंभात एका नवरदेवाची वरात काढण्यात आली होती. नवरदेव घोड्यावर बसलेला होता आणि त्याच्यासोबत वरातीतील काही मंडळी सुद्धा होती. मात्र कोरोनाच्या या संकटात नवरदेवाने चेहऱ्यावर मास्क लावलाच नव्हता. यामुळेच नागपूर मनपाच्या अधिकाऱ्यांनी या नवरदेवाला दंड ठोठावला आहे. वरातीत सहभागी झालेल्या मंडळींवर देखील मास्क न लावल्यामुळे दंडात्मक कारवाई करुन दंड वसूल करण्यात आला आहे.
महत्वाच्या बातम्या
- ….तर पुजाराला संघाबाहेर करावे, गावसकरांनी मांडले मत
- ऑलिम्पिक स्पर्धेपूर्वी भारताची धावपटु हिमा दास दुखापतग्रस्त
- डब्ल्युटीसी गमावल्यानंतरही अमरनाथ यांच्याकडून विराटचे कौतुक
- ‘आठवणीतले दिवस’, फलंदाजीचा सराव करत असताना चाहरला आठवले शाळेतले दिवस!
- ‘फायनल हा एकच सामना असतो’ ; बेस्ट ऑफ थ्रीवरून कोहलीला सुनावले
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

